AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes: ऑस्ट्रेलियाला पराभवानंतर धक्का, मालिका जिंकली पण 4 दिवसात 90 कोटींचं नुकसान

एशेज कसोटी मालिकेतील चार सामने पार पडले असून 3-1 अशी स्थिती आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यानंतरच मालिका जिंकली आहे. पण चौथ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असताना ऑस्ट्रेलियाला 4 दिवसांठी 90 कोटींचा फटका बसला आहे. कसं काय ते जाणून घ्या...

| Updated on: Dec 27, 2025 | 7:37 PM
Share
एशेज कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने आपल्या खिशात घातली आहे. पण इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याचं स्वप्न मात्र भंगलं आहे. इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात 4 विकेट राखून ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. इंग्लंडने 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं. पण हा सामना दोन दिवसातच संपला.(फोटो- आयसीसी ट्वीटर)

एशेज कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने आपल्या खिशात घातली आहे. पण इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याचं स्वप्न मात्र भंगलं आहे. इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात 4 विकेट राखून ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. इंग्लंडने 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं. पण हा सामना दोन दिवसातच संपला.(फोटो- आयसीसी ट्वीटर)

1 / 5
बॉक्सिंग डे अर्थात 26 डिसेंबर रोजी शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये हा कसोटी सामना सुरु झाला. पण दोन दिवसात म्हणजे 27 डिसेंबरला या कसोटी सामन्याचा निकाल लागला. इंग्लंडने दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या डावात विजयासाठी दिलेल्या 175 धावा 6 विकेट गमवून गाठल्या आणि विजय मिळवला. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

बॉक्सिंग डे अर्थात 26 डिसेंबर रोजी शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये हा कसोटी सामना सुरु झाला. पण दोन दिवसात म्हणजे 27 डिसेंबरला या कसोटी सामन्याचा निकाल लागला. इंग्लंडने दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या डावात विजयासाठी दिलेल्या 175 धावा 6 विकेट गमवून गाठल्या आणि विजय मिळवला. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

2 / 5
पराभवानंतर चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचं 60 कोटींचं नुकसान झालं आहे. हा सामना पाच दिवस चालला असता तर अजून 60 कोटी रुपये खात्यात पडले असते. बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतो. यावेळी 94 हजार लोकांनी हजेरी लावली होती. दोन दिवसात 1.86 लाख लोकांनी हा सामना पाहिला. (फोटो- आयसीसी ट्वीटर)

पराभवानंतर चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचं 60 कोटींचं नुकसान झालं आहे. हा सामना पाच दिवस चालला असता तर अजून 60 कोटी रुपये खात्यात पडले असते. बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतो. यावेळी 94 हजार लोकांनी हजेरी लावली होती. दोन दिवसात 1.86 लाख लोकांनी हा सामना पाहिला. (फोटो- आयसीसी ट्वीटर)

3 / 5
तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही अशीच गर्दी झाली असती. पण हा सामना दुसऱ्या दिवशीच संपल्याने उर्वरित दिवसांची तिकीटं रद्द करावी लागली. याचा फटका फक्त तिकीट विक्रीवरच नाही तर ब्रॉडकास्टिंग, जाहिराती आणि इतर आर्थिक स्रोतांवरही पडला. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसला. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही अशीच गर्दी झाली असती. पण हा सामना दुसऱ्या दिवशीच संपल्याने उर्वरित दिवसांची तिकीटं रद्द करावी लागली. याचा फटका फक्त तिकीट विक्रीवरच नाही तर ब्रॉडकास्टिंग, जाहिराती आणि इतर आर्थिक स्रोतांवरही पडला. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसला. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

4 / 5
एशेज मालिकेचा पहिला सामनाही अवघ्या दोन दिवसांत संपला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला, परंतु दोन दिवसांत खेळ संपल्याने बोर्डाच्या महसुलावर मोठा परिणाम झाला. अंदाजे 5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंवा अंदाजे 30 कोटीचे नुकसान झाले. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

एशेज मालिकेचा पहिला सामनाही अवघ्या दोन दिवसांत संपला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला, परंतु दोन दिवसांत खेळ संपल्याने बोर्डाच्या महसुलावर मोठा परिणाम झाला. अंदाजे 5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंवा अंदाजे 30 कोटीचे नुकसान झाले. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.