AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा ही आनंद दिघेंचीच इच्छा, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

जनतेच्या आशीर्वादाने सध्या सर्वोच्च पदावर असलो तरी या पदापेक्षा जनतेसाठी काय करता येते हे महत्वाचे आहे. गेल्या दीड महिन्यापासून अविरत जनतेची सेवा सुरु आहे. शिवाय झालेला बदलही जनतेने स्विकारलेला आहे. त्यामुळे आता मागच्या राजकारणात न पडता केवळ सर्वसामान्यांचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

Eknath Shinde : ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा ही आनंद दिघेंचीच इच्छा, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
आनंग दिघेंच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| Updated on: Aug 26, 2022 | 3:45 PM
Share

मुंबई :  (CM Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दीड महिना लोटला आहे. असे असताना आजही मुख्यमंत्रीपदी विराजमान का व्हावे लागले हे सांगताना भिन्नता समोर येत आहे. यापू्र्वी हिंदूत्व आणि (Balasaheb Thackeray) बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी ही क्रांती केल्याचे त्यांनी अनेकवेळा सांगितले आहे. मात्र, (Aanand Dighe) आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी आनंद मठात दाखल झाले तेव्हा मात्र, हिंदूत्वाचा उल्लेख न करता केवळ आनंद दिघे यांची इच्छा होती की, या राज्याच्या सर्वोच्च पदावर ठाणेकर असावा, शिवाय ही त्यांची इच्छा त्यांच्या बहीण अरुणाताई यांनी बोलूनही दाखवल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे बंडानंतर सत्तांतर झाले मात्र, नेमका कोणत उद्देश ठेऊन हा प्रश्न आजही कायम आहे.

आतापर्यंत वक्तव्यामध्ये असा तो फरक

शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट निर्माण केला. मात्र, बंडाच्या दरम्यान केवळ हिंदूत्व आणि महाविकास आघाडीमध्ये नको या दोनच मुद्द्यांवर त्यांनी भर दिला होता. त्यानंतर शिवसेनेकडून होत असलेली टीका टिपण्णी पाहता त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासण्यासाठी ही भूमिका घेतल्याचे सांगितले. तर आज आनंद दिघे यांचीच इच्छा होती की, राज्याच्या सर्वोच्च पदावर ठाणेकर असावा म्हणून. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे हे समजू शकलेले नाही.

पदापेक्षा काम महत्वाचे..!

जनतेच्या आशीर्वादाने सध्या सर्वोच्च पदावर असलो तरी या पदापेक्षा जनतेसाठी काय करता येते हे महत्वाचे आहे. गेल्या दीड महिन्यापासून अविरत जनतेची सेवा सुरु आहे. शिवाय झालेला बदलही जनतेने स्विकारलेला आहे. त्यामुळे आता मागच्या राजकारणात न पडता केवळ सर्वसामान्यांचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आतापर्यंत ऐतिहासिक निर्णय घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. विरोधकांकडून काहीही अफवा पसरवल्या जात असल्या तरी जनतेशी बांधील असल्याने त्याकडे दुर्लक्ष असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

आनंद दिघे यांची पुण्यतिथी

आंगद दिघे यांची आज पुण्यतिथी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मठात दाखल झाले होते. त्यांनी दिघेंच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि आनंद दिघे यांच्या विचाराचाच आपल्यावर प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय त्यांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा याशिवाय हे शक्य नव्हते असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यांच्या सानिध्यामध्ये अनेक वर्ष काम केले. त्यांचा आदर्श, शिकवण आणि कार्यपद्धती याचा आपल्यावर प्रभाव असल्यानेच हे शक्य झाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी केलेले विधान अनेकांसाठी वेगळे असू शकते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.