AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तास्थापनेसाठी भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करतंय : संजय राऊत

भाजप साम, दंड, भेद वापरून सत्तेसाठी सरकारी यंत्रणांचा वापर (Misuse of Government institutions) करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सत्तास्थापनेसाठी भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करतंय : संजय राऊत
| Updated on: Nov 03, 2019 | 4:20 PM
Share

मुंबई: भाजप आणि शिवसेनेतील सत्तासंघर्ष (BJP Shivsena Dispute on Government Formation) शिगेला पोहचला आहे. भाजपकडून सत्तेसाठी विरोधकांना लक्ष्य करून संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भाजप साम, दंड, भेद वापरून सत्तेसाठी सरकारी यंत्रणांचा वापर (Misuse of Government institutions) करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपने राष्ट्रवादीचे 45 जण अशाचप्रकारे साम, दाम, दंड, भेद वापरूनच फोडले. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं मत काँग्रेसचे नेते राजन भोसले यांनी व्यक्त केलं आहे. सत्तेवरून शिवसेना भाजपमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे युती होईल की नाही याबाबतची शंका राजकिय विश्लेषकही व्यक्त करत आहेत.

शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्री पद आणि सत्तेतील समसमान वाटा या मुद्द्यांनी तणाव वाढला आहे. या संघर्षामुळे संजय राऊत यांनी राजकीय गौप्यस्फोट केला आहे. भाजपच्या मित्रपक्षानेच त्यांच्यावर सत्तास्थापनेसाठी साम-दाम-दंड-भेदासह सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय खळबळ निर्माण झाली आहे. आता भाजपची मोठी कोंडी झाली आहे.

यावर भाजपचे आमदार राम कदम म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला. त्याचा सन्मान करावा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी खात्री आहे. शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस हीच सर्वांची पसंती आहे. राजकारणात सर्वच राजकीय पक्षांना महत्वकांक्षा असणे गैर नाही. आमच्याकडे आकडे आहे. कॅमेरा समोर सांगणे योग्य नाही. येत्या 2-3 दिवसात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दिसतील.

विशेष म्हणजे सत्तेतील वाट्यासाठी भांडणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आता ओला दुष्काळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा करण्याकडे मोर्चा वळवला आहे. सत्तासंघर्षात भाजप-शिवसेना जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याची जनभावना तयार झाल्यामुळेच हे दौरे होत असल्याचाही आरोप होत आहे.

आता सत्ता स्थापनेसाठी भाजप कोणत्या कुरघोडी करणार आणि शिवसेना आपल्या भूमिकेतून भाजपवर किती दबावतंत्र वापरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.