AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांची आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी, नंतर निर्णय घेतील; चंद्रकांतदादांनी उडवली खिल्ली

लॉकडाऊन आणि राज्यातील जनतेला द्यावयाच्या पॅकेजबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. (chandrakant patil slams cm uddhav thackeray over lockdown in maharashtra)

मुख्यमंत्र्यांची आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी, नंतर निर्णय घेतील; चंद्रकांतदादांनी उडवली खिल्ली
Chandrakant Patil
| Updated on: Apr 13, 2021 | 6:41 PM
Share

कोल्हापूर: लॉकडाऊन आणि राज्यातील जनतेला द्यावयाच्या पॅकेजबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची कोरोनाशी चर्चा बाकी असेल. त्यानंतर ते निर्णय घेतील, अशा शब्दात चंद्रकातंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. (chandrakant patil slams cm uddhav thackeray over lockdown in maharashtra)

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, मला कुणी तरी एक मेसेज पाठवला. सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. आता फक्त कोरोना अशी चर्चा बाकी आहे. त्यानंतर निर्णय घोषित केला जाईल, असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं, असा टोला पाटील यांनी लगावला.

तर लॉकडाऊन अमान्य

डोळे विस्फारतील असं पॅकेज देऊ असं एक वर्षापूर्वी कामगार मंत्री हसम मुश्रीफ म्हणाले होते. मात्र यातील फुटकी कवडीही कामगारांना दिली नाही, असा चिमटा त्यांनी मुश्रीफांना काढला. हा विषाणू लवकर संपणार नाही. काळजी घेऊन लोकांचं जनजीवन सुरळीत ठेवलं पाहिजे. प्रादुर्भाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. असंघटीत कामगारांना वर्षभरात काहीच पॅकेज देण्यात आलं नाही. त्यामुळे आता महिनाभर लॉकडाऊन करणार असाल तर कामगारांना रेशन, किराणा आणि भाजी मोफत देण्याची घोषणा करा. याची व्यवस्था न करता लॉकडाऊन करत असाल तर तो आम्हाला मान्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मुश्रीफांना टोला

यावेळी त्यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या बदलीवरून मुश्रीफ यांना टोला लगावला. शुक्ला यांच्या बदलीवर संशय व्यक्त करण्या इतका मी तज्ज्ञ नाही. ही रुटीन बदली आहे. तर तीन महिन्यांपूर्वीच व्हायला हवी होती. आपल्याकडे खूप हुशार लोकं आहेत. बदली काय असते हे त्यांना सांगावं का?, असा टोलाही त्यांनी लगावला. (chandrakant patil slams cm uddhav thackeray over lockdown in maharashtra)

संबंधित बातम्या:

Maharashtra lockdown guidelines : महाराष्ट्रात लॉकडाऊन केल्यास नियम काय असू शकतात?

मी कच्च्या गुरुचा चेला नाही आणि धनंजय मुंडेंनी मध्येच भाषण थांबवले!

Maharashtra Lockdown Update: उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार, लॉकडाऊनविषयी मुख्यमंत्री काय बोलणार?

(chandrakant patil slams cm uddhav thackeray over lockdown in maharashtra)

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...