AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Floor Test : …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच राजीनामा देणार!

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. आज मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) हे राजीनामा देऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Maharashtra Floor Test : ...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच राजीनामा देणार!
उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2022 | 11:27 AM
Share

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, उद्या बहुमत सिद्ध करावे असे म्हटले आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. आज पाच वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये  औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावाला विरोध झाल्यास मुखमंत्री उद्धव ठाकरे हे आजच राजीनामा देऊ शकतात अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेकडून नामकरणाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले असून, अल्पमतात आल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. उद्या बहुमत सिद्ध करावे असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या या पत्रात म्हटले आहे. मात्र सध्या महाविकास आघाडीकडे पुरेसे आमदारांचे संख्याबळ नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याविरोधात महाविकास आघाडी सरकारने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी पाच वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

आमदारांचा मुक्काम कुठे?

दरम्यान दुसरीकडे आम्ही या बहुमत चाचणीच्या प्रक्रियेत सहभागी होणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र बहुमत चाचणीत सहभागी होण्यासाठी बंडखोर आमदारांना मुंबईत यावे लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याचा मुक्काम कुठे असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर बोलण्यास बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र हे आमदार सुरत, मुंबई किंवा गोव्यामध्ये मुक्काम करू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.