AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून काँग्रेसचा पराभव होतोय; खरेगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना सुनावलं, सांगितलं महत्त्वाचं कारण

हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

...म्हणून काँग्रेसचा पराभव होतोय; खरेगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना सुनावलं, सांगितलं महत्त्वाचं कारण
mallikarjun kharge
| Updated on: Nov 29, 2024 | 6:45 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं चांगली कामगिरी केली होती.काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये 99 जागा जिंकल्या होत्या. या जागा भाजपच्या तुलनेत खूप कमी असल्या तरी राजकीय तज्ज्ञांच्या मते काँग्रेसचं हे दमदार पुनरागमन मानलं गेलं. मात्र त्यानंतर झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचा मोठा पराभव झाला.महाराष्ट्रात तर काँग्रेसला केवळ 16 जागाच जिंकता आल्या.हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पराभवाचं कारण सांगितलं आहे. काँग्रेसच्या पराभवाला नेत्यांची बेताल वक्तव्य आणि एकतेचा अभाव हे कारणीभूत असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांची देखील उपस्थिती होती.सोबतच अजून वेळ गेलेली नाही, असा सल्ला देखील या बैठकीमध्ये खरगे यांनी आपल्या नेत्यांना दिला आहे.

नेमकं काय म्हणाले खरगे?

या बैठकीमध्ये बोलताना खरगे यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण चांगली कामगिरी केली होती.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये देखील एक वेगळा उत्साह होता. मात्र त्यानंतर तीन राज्यात निवडणुका झाल्या तिथे आपल्याला जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. इंडिया आघाडीनं चार पैकी दोन राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं मात्र त्यामध्ये काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती.मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो. आपल्या पराभवाची दोनच कारणं आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षात असलेला एकजुटीचा अभाव आणि दुसरं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद, एकमेकांविरोधात देण्यात येणारी स्टेटमेंट , यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे, जर हे वेळीच थांबवलं गेलं नाही तर याचा मोठा फटका हा आपल्या पक्षाला बसू शकतो.

पुढे बोलताना खरगे यांनी म्हटलं की, ज्या राज्यात आपला पराभव झाला तिथे आपली संघटना म्हणावी तेवढी मजबूत नाहीये. आपल्याला त्या राज्यात आपलं संघटन मजबूत करण्याची गरज आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची एक मजबूत मोट आपल्याला बांधावी लागणार आहे.सोबतच त्या -त्या राज्यात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे देखील आपल्या दुर्लक्ष करून चालणार नाही, तेथील स्थानिक मुद्दे आपल्या लक्षात घ्यावे लागतील, त्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रूपरेषा तयार करावी लागेल.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.