AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसने दलितांचा फक्त ‘व्होटबँक’ म्हणून वापर केला- मुख्यमंत्री

नागपूर : “काँग्रेसनं देशात 55-60 वर्षे सत्ता भोगली, पण दलितांचा फक्त व्होटबँक म्हणून वापर केला. संविधानाचा बाप असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काँग्रेसने एक इंचंही जागा दिली नाही. आम्ही सत्तेत आल्यावर तीन दिवसांत इंदू मिलच्या जागेची परवानगी आणली”, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.  नागपुरातील भाजपच्या विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.  यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  […]

काँग्रेसने दलितांचा फक्त 'व्होटबँक' म्हणून वापर केला- मुख्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM
Share

नागपूर : “काँग्रेसनं देशात 55-60 वर्षे सत्ता भोगली, पण दलितांचा फक्त व्होटबँक म्हणून वापर केला. संविधानाचा बाप असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काँग्रेसने एक इंचंही जागा दिली नाही. आम्ही सत्तेत आल्यावर तीन दिवसांत इंदू मिलच्या जागेची परवानगी आणली”, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.  नागपुरातील भाजपच्या विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.  यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. भाजपच्या या विजयी संकल्प सभेला देशभरातील अनुसूचित जातीचे 25 हजारपेक्षा जास्त लोक आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरींनीही काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.  “काँग्रेसने आणीबाणी आणली, 80 वेळा देशाचं संविधान बदललं, तोच काँग्रेस पक्ष भाजप संविधान बदलणार, असं विष पसरवत आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. दलितांचा फक्त मतांसाठी वापर करणारी काँग्रेस महाराष्ट्रात येऊन दलित-दलित करत आहे” असंही गडकरींनी नमूद केलं.

“आजपर्यंत काँग्रेसने अनुसूचित जातीचा फक्त मतांसाठी वापर केला. आम्ही दलितांसाठी विकास कामं केलीत. भाजप संविधान बदलणार, असे विष काँग्रेसकडून पसरवलं जातंय”, असा घणाघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केला.

“शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही आणि अर्धा पगार आम्ही, हिच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची रोजगार हमी” अशा शब्दात गडकरींना काँग्रेसवर टीका केली.

दरम्यान राजनाथ सिंह म्हणाले,  “दलितांसाठी काम करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाएवढी देशात मोठी संघटना नाही. संघ आणि भाजपही दलितांसाठी अनेक समाजकल्याणाची कामं करत आहेत”

भाजपच्या या विजयी संकल्प सभेत राज्यातील प्रमुख अनुसूचित जातीतील मंत्री आणि आमदारांची उपस्थिती होती. आगामी निवडणुकीत दलित समाजाच्या मतांवर डोळा ठेऊन भाजपनं विजयाचा संकल्प केला. पण तो पूर्ण होणार का हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच ठेरलं.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.