AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepak kesarkar: 50 खोकेच काय 50 रुपये जरी घेतले असतील तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल- दीपक केसरकर

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पैसे देण्यात आले.  50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलंय.

Deepak kesarkar: 50 खोकेच काय 50 रुपये जरी घेतले असतील तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल- दीपक केसरकर
| Updated on: Aug 24, 2022 | 11:55 AM
Share

मुंबई : सध्या विधिमंडळाचं अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) होतंय. अश्यात 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पैसे देण्यात आले.  50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलंय. 50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल, असं दीपक केसरकर (Deepak kesarkar) म्हणालेत. “सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. विधान सभेत पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात तेव्हा मी विधान परिषदेत तो मुद्दा खोदून काढला. साधे 50 रुपये जरी मी घेतलेले असलेले तरी मी राजीनामा देईन. आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो”, असं केसरकर म्हणाले.

“आमदार गप्प आहेत त्यांना गप्पा राहू द्यात. खड्डे मुक्त रस्त्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. शेतकऱ्यांना मदत करण्यात आली, शेतकरी देखील सुखी झालेला आहे. मागच्या वर्षी जे सरकार होतं त्यांच्या पेक्षा जास्त निधी आम्ही दिला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसायचा अधिकार तुम्हाला आहे का?”, असा सवालही केसरकरांनी केलाय.

दीपक केसरकर यांनी राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावरही प्रतिक्रिया दिली. ज्या प्रमाणे उद्धव साहेबांनी काही बोल तर बोलायचं नाही आम्ही ठरवलं आहे. त्यांनी शिवसेनेची बांधणी केली आणि शिवेनेची फळी मजबूत झाली. जेवढं प्रेम उद्धव साहेबांवर होतं तेवढं राज साहेबांवर पण आहे. पुढच्या काळात राजकीय पक्ष म्हणून आमचा विचार असणार आहे.हिंदुत्ववाची व्याख्या राज साहेब देखील पुढे घेऊन आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी राजकारण करत आहेत. काँग्रेसच्या संस्कृतीतुन मी देखील मोठा झालो. काँग्रेसच्या विचार धारेपासून तुम्ही लांब जाता तेव्हा काँग्रेस बोलता येत नाही, असंही केसरकर म्हणाले आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. आजही त्यांनी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. तर त्याचवेळी सत्ताधारी पक्षही तिथे उपस्थित होता. यावेळी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळी विरोधकांनी गाजर आणले होते. हे गाजर हाती घेत सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

Follow Us
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.
सर्वांना सुखरुप भारतात आणणार! शिंदेंनी दिलं आश्वासन
सर्वांना सुखरुप भारतात आणणार! शिंदेंनी दिलं आश्वासन.
दुबईत अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले!
दुबईत अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले!.