AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला?; देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीने दादरच्या वसंत स्मृती भवन या पार्टी कार्यालयात बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदार उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला? याचा खुलासा केला. दिल्लीतून आल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस यांनी या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं.

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला?; देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 08, 2024 | 4:18 PM
Share

लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश आलं नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. फडणवीस यांनी थेट पत्रकार परिषदेतच मंत्रीपदावरून मोकळं करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेमागच्या विविध थिअऱ्या व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय का व्यक्त केला, याचा खुलासाच फडणवीस यांनी केला आहे.

भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केला. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं. ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. भाजपचं नेतृत्व मी करत होतो. म्हणून अपयशाची जबाबदारी माझी आहे हे मी सांगितलं. तुम्ही सर्वांनी उत्तम काम केलं. केवळ पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये आपण कमी पडलो. कसं पडलो हे मी सांगितलंच आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस पळणारा नाही

मला मोकळं करून काम करण्याची संधी द्या, असं मी म्हटलं तेव्हा निराशेतून म्हटलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. आम्ही लढणारे आहोत. चारही बाजूने घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे. कुणाला वाटलं असेल मी निराश झालो किंवा भावनेच्याभरात राजीनाम्याचं बोललो असं नाही. माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती. त्यावर मला काम करायचं होतं. अमित शाह यांना मी भेटलो. त्यांनाही मी माझ्या डोक्यात काय हे सांगितलं. पण सध्या ही वेळ नसल्याचं अमित शाह म्हणाले. आपण नंतर एकत्र बसून महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करू असं शाह म्हणाले, अशी माहिती देतानाच निवडणुकीचा निकाल लागताच मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलोय. एक मिनिटंही मी शांत बसणार नाही. आता मी काम करत आहे. करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नव्याने पेरणी करण्याची वेळ

मोदींच्या यशात 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. यावेळी तो वाटा उचलू शकलो नाही. या निवडणुकीत काही गणितं चुकली. त्यामुळेच नव्याने पुनरावलोकन व्हावं आणि नवीन स्ट्रॅटेजी यावी म्हणून बैठक घेतली. आपण निर्धार केलाय जे अपेक्षित यश आलं नाही, त्याची कारणं शोधून ती दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा निर्धार व्यक्त केला आहे. उन्हाळा संपतो, काहीली संपलीय. आता पाऊस पडत असताना जे पेरलं जातं तेच उगवतं. आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे, असं फडणवीस म्हणाले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.