AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणाच्या दसरा मेळाव्यासाठी किती कार्यकर्ते उपस्थित?, मुंबई पोलिसांनी सांगितला आकडा

गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहाता, शिवसैनिक कोणाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार याबाबत उत्सुकता होती. अखेर दोन्ही दसरा मेळाव्याला किती लोक उपस्थित होती याची आकडेवारी समोर आली आहे.

कोणाच्या दसरा मेळाव्यासाठी किती कार्यकर्ते उपस्थित?, मुंबई पोलिसांनी सांगितला आकडा
| Updated on: Oct 06, 2022 | 11:18 AM
Share

मुंबई: गेल्या महिनाभरापासून दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलचं तापलं होतं. अवघ्या राज्याचं लक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाच्या मेळाव्याकडे लागलं होतं. अखेर बुधवारी बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा तर शिवाजी पार्कमध्ये शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही गटांकडून एकोंमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. हे दोन्ही मेळावे आणखी एका कारणासाठी चर्चेत होते, ते म्हणजे दोन्ही गटाकडून दावा करण्यात येत होता की आमच्याच दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होईल. अखेर कोणाच्या दसरा मेळाव्याला किती लोकांनी हजेरी लावली याचा अंदाज मुंबई पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

 दसरा मेळाव्याला किती कार्यकर्ते उपस्थित ?

गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहाता पोलिसांनी दोन्ही दसरा मेळाव्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होती याबाबतचा एक अंदाज मुंबई पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला एक लाख तर शिंदे गटाच्या मेळाव्याला अंदाजे दोन लाख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

गर्दीवरून आरोप

दरम्यान शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात असे काही लोकं होते ज्यांना ते इथे कशासाठी आले आहेत हेच त्यांना माहित नव्हतं. कोणी म्हणायचं आम्ही राम शिंदे यांच्या सभेला आलो आहोत, तर कोणी म्हणायचं आम्ही उद्धव ठाकरेंच्या सभेला आलो आहोत, असा टोला शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेला उपस्थित असलेल्या कोणत्याही शिवसैनिकाला विचारा की तुम्ही इथे कशासाठी आला आहात तर त्यांचे एकच उत्तर असेल ते म्हणजे आम्ही उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला आलो आहोत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.