AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“2024 ला नामोनिशान मिटणार, तरिही उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार नाहीत!”, शिंदेगटाच्या नेत्याचा घणाघात

शिंदेगटाच्या नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका...

2024 ला नामोनिशान मिटणार, तरिही उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार नाहीत!, शिंदेगटाच्या नेत्याचा घणाघात
| Updated on: Dec 22, 2022 | 3:42 PM
Share

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदेगटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 2024 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचं नामोनिशानही राहणार नाही, तरिही उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार नाहीत, असं राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी म्हटलं आहे.

अनेक नेते शिवसेना सोडून जात आहेत. अनेकजण नाराज आहेत. याचं कुणाला काही देणंघेणं नाही. उद्धव ठाकरे यांचा अहंकार आड येतोय. ते अहंकाराने वागत आहेत. आत्मपरिक्षण करीयली ते तयार नाहीत. त्यामुळे लोक पक्ष सोडून जात आहेत, असं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी आमच्या गटाच्या नेत्यांवर आरोप करताना विचार केला पाहिजे. 2019 हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मत दिली होती. याचा विसर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना पडता कामा नये.

2024 बाळासाहेबांची शिवसेना राज्यात मोठ्या प्रमाणावर आमदार घेऊन पुढे येईल. राज्याच्या राजकारणात बाळासाहेबांची शिवसेना आपला वेगळा ठसा उमटवेल, असं म्हणत राजेश क्षीरसागर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

गेल्या अडीच वर्षात महाविकासाकडे काही केलंच नाही. आता समाजहिताचे निर्णय होत आहेत.चांगलं वातावरण निर्माण होतंय म्हणून विरोधकांना दुसरं काम उरलं नाही. पुढच्या दोन वर्षात देखील राज्याची मोठ्या प्रमाणावर प्रगती होईल. हे विरोधकांना बघवत नाही, असंही क्षीरसागर म्हणालेत.

दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याबाबत विचारलं असता राजेश क्षीरसागर यांनी बोलणं टाळलं.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.