AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या बंडखोरीवरून घमासान, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे महत्त्वाचे सवाल! काय Updates?

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात ठाकरे गटाने काल दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली आहे. यासंदर्भातील युक्तिवाद आणि तसेच पुढील सुनावणी उद्या दुपारी ३.३० वाजेपर्यंत होणार आहे.

सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या बंडखोरीवरून घमासान, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे महत्त्वाचे सवाल! काय Updates?
Image Credit source: social media
| Updated on: Feb 21, 2023 | 12:07 PM
Share

नवी दिल्लीः सत्तासंघर्षाच्या (Maharashtra political crisis ) महासुनावणीला आज सुप्रीम कोर्टात (Supreme court)  पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी शिवसेनेतील फुटीर गटाचे अधिकार आणि त्यांच्या कृतीवरून महत्त्वाचे प्रश्न कोर्टासमोर उपस्थित केले आहेत. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांची बंडखोरी हा अत्यंत नियोजित प्लॅन होता, असे वारंवार सांगण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरणाशी हा घटनाक्रम सुसंगत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. मात्र ठाकरे गटाकडून ही दोन्ही प्रकरणं वेगळी असल्याचा दावा करण्यात येतोय. याच मालिकेत कपिल सिब्बल यांनी आज कोर्टासमोर प्रश्न उपस्थित केले.

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद काय?

  • विधिमंडळ पक्षातील फुट ही पार्टीची फुट मांडायची का ?
  •  आम्ही नेतृत्वाला मानत नाही, असं फुटीर गट म्हणू शकतो का?
  •  एकाच चिन्हावर निवडून आलेले लोक वेगळे निर्णय घेऊ शकतात का?
  •  वाट्टेल ते आम्ही करू, असं म्हणायचा अधिकार फुटीर गटाला आहे का?
  •  विधानसभेत फूट आहे का, हे पाहण्याची जबाबदारी अध्यक्षांची आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय.
  •  पक्षात २ गट झाल्यामुळे चिन्हाचं प्रकरण आयोगाकडे पाठवणं योग्य नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय.
  •  शिवसेनेचं प्रकरण घटनापीठासमोर असताना आयोग कसा निर्णय देऊ शकतं, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केलाय.

ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी उद्या

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात ठाकरे गटाने काल दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली आहे. यासंदर्भातील युक्तिवाद आणि तसेच पुढील सुनावणी उद्या दुपारी ३.३० वाजेपर्यंत होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेसंदर्भात घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचं ठाकरे गटाच्या याचिकेत म्हटलं आहे. तसेच घटनापीठासमोरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती मिळावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

शिंदे गटाची आगेकूच

कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु असताना निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शिंदे गटाची आगेकूच सुरु आहे. काल विधीमंडळातील शिवसेना कार्यालय शिंदे गटातील आमदारांनी ताब्यात घेतलं. आज शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील या बैठकीला आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत एकनाथ शिंदे हे पक्ष प्रमुख पद स्वीकारतील, अशी चर्चा आहे.

Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.