AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1962 पासून आमदार, गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढवणार नाहीत

तब्बल अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले सोलापूर जिल्ह्यातील आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

1962 पासून आमदार, गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढवणार नाहीत
| Updated on: Jul 29, 2019 | 4:09 PM
Share

सोलापूर : तब्बल अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले सोलापूर जिल्ह्यातील आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे मी विधानसभा लढवणार नसल्याचे नुकतंच त्यांनी स्पष्ट केले आहे.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे देशमुखांनी सांगितले आहे.  सांगोला तालुक्यातील कोळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. दरम्यान शेकापचा बाल्लेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 94 हजार 374 मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा पराभव केला होता.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागेल आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. त्यात काही वरिष्ठ नेत्यांच्या मतदारसंघासाठी चाचपणीही सुरु झाली आहे. तसेच पक्षातील कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचेही आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.

कोण आहेत गणपतराव देशमुख?

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला.  गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत.1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. त्यानंतर 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांना भरभरुन मतांनी विजयी केलं आहे. विशेष म्हणजे 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता.

महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार म्हणूनही गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. त्यांचे सध्या वय 94 आहे. सलग अकरा वेळा निवडून विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रमाचीही देशमुख यांच्या नावे नोंद आहे.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक