AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी कुठल्याच आमदाराला भेट नाकारत नाही, कॅन्सर हवेतून पसरत नाही; चौधरींच्या आरोपाला आव्हाडांचं प्रत्युत्तर

Jitendra Awhad | मी कोणतीही गोष्ट पूर्वपरवानगीशिवाय करत नाही. मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली. त्यानंतर पवारसाहेब रुग्णालयात होते, ते रुग्णालयातून आल्यानंतर चाव्या देण्यााच कार्यक्रम झाला.

मी कुठल्याच आमदाराला भेट नाकारत नाही, कॅन्सर हवेतून पसरत नाही; चौधरींच्या आरोपाला आव्हाडांचं प्रत्युत्तर
अजय चौधरी आणि जितेंद्र आव्हाड
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 1:39 PM
Share

मुंबई: टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका (Tata Cancer center) देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बुधवारी सकाळीच मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्याला भेट दिली नसल्याचा दावा केला. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता जितेंद्र आव्हाड यांनी हा दावा खोडून काढला आहे. मी कुठल्याच आमदाराला भेट नाकारत नाही. तसेच टाटा कॅन्सर रुग्णालयाला सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच परवानगीनंतर घेण्यात आला होता, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता यावर शिवसेनेचे नेते आणखी काही बोलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (NCP Jitendra Awhad on Shiv Sena MLA Ajay Chaudhary complaints)

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

मी कोणतीही गोष्ट पूर्वपरवानगीशिवाय करत नाही. मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली. त्यानंतर पवारसाहेब रुग्णालयात होते, ते रुग्णालयातून आल्यानंतर चाव्या देण्यााच कार्यक्रम झाला. मी घरी आल्यानंतर पहिला कार्यक्रम हाच घेऊ असं पवारसाहेबांनी म्हटलं होतं. उद्धवजीही म्हणाले पवारसाहेबांच्या हस्ते कर, पण गर्दी करु नका, ते सुद्धा तितकेच संवेदनशील होते.

आमदार अजय चौधरी नेमकं काय म्हणाले मला माहिती नाही. कुठल्याही आमदाराची अशी तक्रार असणार नाही की मी भेट देत नाही. भेटीसाठी वेळ दिली नाही असं होणार नाही. अनेक कामं अजय चौधरींची केली आहेत.. कोणताही कॅन्सर पेशंट त्या इमारतीत राहणार नाही, दोन तीन महिने त्या पेशंटवर उपचार सुरु असतात, त्यावेळी त्याचे कुटुंब ज्या अवस्थेत राहतात, त्यांच्यासाठीची सेवा म्हणून या खोल्या देण्यात येणार आहेत. कॅन्सर काही हवेतून पसरत नाहीत, तिथल्या लोकांचा गैरसमज दूर करु, यातून मार्ग काढू, मार्ग हा निघेलच.

‘मी सीमा ओलांडली नाही, आव्हाडांनी दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांकडे’

शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाडांचा ड्रीम प्रोजेक्ट स्थगित झाला आहे. चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर राज्य सरकारने या टाटा कॅन्सर रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. याविषयी अजय चौधरी यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती. कॅन्सरग्रस्तांसाठी इथे जागा दिली जात असली, तरी त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका आहे. त्याविरोधात स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांकडे पाठपुरावा केला. पत्रं लिहिली, त्यांच्या पीएला भेटलो, पण मी मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत माझी दखल घेतली नाही. मी कोणतीही सीमा ओलांडली नाही. स्थानिक आणि लोकप्रतिनिधींना विचार न घेता हा निर्णय घेण्यात आला, असं शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी सांगितलं होते.

संबंधित बातम्या 

मी सीमा ओलांडली नाही, आव्हाडांनी दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांकडे, अजय चौधरींची रोखठोक प्रतिक्रिया

Breaking : जितेंद्र आव्हाडांना धक्का, टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्थगित!

(NCP Jitendra Awhad on Shiv Sena MLA Ajay Chaudhary complaints)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.