AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मागच्या सरकारसारखी आमच्यात नळावरची भांडणं नाहीत’, सर्व आलबेल असल्याचा पटोलेंचा पुनरुच्चार

काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी मागच्या युतीच्या सरकारसारखी आमच्यात नळावरची भांडणं नाहीत, असं पटोले यांनी म्हटलंय. मात्र, सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलं नसल्याचं पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

'मागच्या सरकारसारखी आमच्यात नळावरची भांडणं नाहीत', सर्व आलबेल असल्याचा पटोलेंचा पुनरुच्चार
| Updated on: May 24, 2021 | 9:25 PM
Share

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं राजकारण पाहायला मिळत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असंही चित्र दिसून येत आहे. कारण, हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्याबाबत विचारलं असता, काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी मागच्या युतीच्या सरकारसारखी आमच्यात नळावरची भांडणं नाहीत, असं पटोले यांनी म्हटलंय. मात्र, सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलं नसल्याचं पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. (No dispute in the Mahavikas Aghadi government, said Nana Patole)

ज्या दिवशी पहाटेचं सरकार (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी) पडलं त्या दिवसापासून विरोधक महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हातात कोलीत घेऊन फिरत आहेत. पण विरोधकांकडे आम्ही लक्ष देत नाही. सोनिया यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आधारित हे सरकार आहे. त्यामुळे आमची ही मागणी कायम राहील. कॉमन मिनिममत प्रोग्रामचं पालन व्हावं, असं आवाहन पटोले यांनी आपला सहकारी पक्षांना केलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कोणतीही नाराजी नाही. सर्वकाही व्यवस्थित सुरु आहे. आमच्या सरकारमध्ये लोकशाही जिवंत आहे. मागच्या सरकारसारखी नळावरची भांडणं आमच्यात नाहीत, असा टोलाही पटोले यांनी हाणलाय.

‘संजय राऊतांची वैयक्तिक वैर नाही’

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणी नाना पटोले यांच्यात मागील काही दिवसांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळालं. त्यावर बोलताना संजय राऊत आणि माझं वैयक्तिक वैर नाही. सरकारमधील प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलेला नाही, असं पटोले म्हणाले. UPA च्या अध्यक्षपदावरुन संजय राऊत आणि काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी शाब्दिक चकमक झडलेली संपूर्ण राज्याने पाहिलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी हे वक्तव्य केलंय.

‘लोकशाहीचा गळा घोटला जाऊ नये म्हणून राज्यपाल’

त्याचबरोबर विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांबाबत बोलताना राज्यपालांनी हे प्रस्ताव पत्र दाबून ठेवलेलं आहे, असा या संपूर्ण प्रकरणाचा अर्थ निघतो, अशी टीकाही पटोले यांनी केलीय. तसंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याांनी कुठेही सांगितलं नाही की आपल्याकडे प्रस्ताव आलेला नाही. लोकशाहीचा गळा घोटळा जाता कामा नये, यासाठी राज्यपालांची नियुक्ती असते. स्वत: राज्यपाल यात पुढाकार घेतील आणि कॅबिनेटने 12 आमदारांचा जो प्रस्ताव पाठवला आहे त्याला मान्यता देतील, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केलीय.

संबंधित बातम्या :

‘मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी मोदींबाबत 3 गोष्टी स्पष्ट केल्या’, पाटल्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा निशाणा

संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले

No dispute in the Mahavikas Aghadi government, said Nana Patole

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.