AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : भारताचे विजयी पॉइंट, या ठिकाणी लिहिली गेली पाकिस्तानच्या पराभवाची स्क्रिप्ट

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याचा निकाल अखेर लागला आहे. भारताने हा सामना सहज जिंकला. फलंदाजीसाठी अवघड असलेल्या मैदानावर भारताने विजयाची स्क्रिप्ट लिहिली. या सामन्यात विजय कुठे आणि कसा झाला ते जाणून घेऊयात..

IND vs PAK : भारताचे विजयी पॉइंट, या ठिकाणी लिहिली गेली पाकिस्तानच्या पराभवाची स्क्रिप्ट
IND vs PAK : भारताचे विजयी पॉइंट, या ठिकाणी लिहिली गेली पाकिस्तानच्या पराभवाची स्क्रिप्टImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 15, 2026 | 10:31 PM
Share

भारत पाकिस्तान सामना पहिल्या षटकापासून तणावपूर्ण दिसला. भारताला पहिल्या षटकातच अभिषेक शर्माच्या रुपाने धक्का बसला. भारताची फक्त 1 धाव असताना अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. त्यामुळे संघावर दडपण आलं होतं. पण येथून भारताने विजयाची स्क्रिप्ट लिहिली. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 175 धावा केल्या. तसेच विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. खरं दुसऱ्या डावात दव फॅक्टर लक्षात घेता भारतीय गोलंदाजांना कठीण जाईल असं वाटलं होतं. पण या येथेही विजयाचं गणित बरोबर सुटलं. त्यामुळे या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसला. पाकिस्तानचा संघ या सामन्यात कुठेच दिसला नाही. हा सामना प्रत्येक विकेटनंतर भारताच्या पारड्यात झुकत गेला. झालंही तसंच.. भारताने हा सामना धावांनी जिंकला आणि सुपर 8 फेरीत जागा पक्की केली.

अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर पाकिस्तानला दुसरी विकेट काढण्यासाठी खूपच घाम गाळावा लागला. तिथपर्यात हा सामना पाकिस्तानच्या हातून जवळपास गेला होता. दुसऱ्या विकेटसाठी इशान किशन आणि तिलक वर्माने 46 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. यात एकट्या इशान किशनने 38 चेंडूत 76 धावा केल्या.

शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानकडून शेवटचं षटक टाकलं आणि 2 विकेट काढल्या. पण या षटकात 16 धावा आल्या. रिंकु सिंहने चौकार आणि षटकार मारत 10 धावा केल्या. तर शिवम दुबेने 5 धावांची खेळी केली. यामुळे भारताला 175 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या डावात या दोन बाजू जमेच्या ठरल्या. जर 160 धावांच्या आत धावा असता तर पाकिस्तानवर दबाव कमी असता.

पाकिस्तान भारताने दिलेल्या धावांचा सहज पाठलाग करेल असं वाटलं होतं. पण पहिल्याच षटकात गणित बदललं. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने साहीबजादा फरहानची विकेट काढली आणि पाकिस्तानला अडचणीत आणलं.

दुसऱ्या षटकात पाकिस्ताने सावरण्याचा प्रयत्न केला. जसप्रीत बुमराच्या पहिल्याच चेंडूवर सैम आयुबने षटकार मारला. पण त्यानंतर विकेट दिली. त्यानंतर आलेल्या सलमान आगाने चौकार मारला आणि दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानचा पराभव पावरप्लेमध्ये निश्चित झाला.

बाबर आझमच्या रुपाने पाचवी विकेट पडली. त्यानंतर सहाव्या विकेटसाठी उस्मान खान आणि शादाब खानने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी अक्षर पटेलने फोडली आणि पराभव निश्चित झाला. त्यानंतर एका पाठोपाठ एक विकेट पडल्या आणि पाकिस्तान पराभवाच्या दरीत कोसळला.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.