AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : भारताचे विजयी पॉइंट, या ठिकाणी लिहिली गेली पाकिस्तानच्या पराभवाची स्क्रिप्ट

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याचा निकाल अखेर लागला आहे. भारताने हा सामना सहज जिंकला. फलंदाजीसाठी अवघड असलेल्या मैदानावर भारताने विजयाची स्क्रिप्ट लिहिली. या सामन्यात विजय कुठे आणि कसा झाला ते जाणून घेऊयात..

IND vs PAK : भारताचे विजयी पॉइंट, या ठिकाणी लिहिली गेली पाकिस्तानच्या पराभवाची स्क्रिप्ट
IND vs PAK : भारताचे विजयी पॉइंट, या ठिकाणी लिहिली गेली पाकिस्तानच्या पराभवाची स्क्रिप्टImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 15, 2026 | 10:31 PM
Share

भारत पाकिस्तान सामना पहिल्या षटकापासून तणावपूर्ण दिसला. भारताला पहिल्या षटकातच अभिषेक शर्माच्या रुपाने धक्का बसला. भारताची फक्त 1 धाव असताना अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. त्यामुळे संघावर दडपण आलं होतं. पण येथून भारताने विजयाची स्क्रिप्ट लिहिली. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 175 धावा केल्या. तसेच विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. खरं दुसऱ्या डावात दव फॅक्टर लक्षात घेता भारतीय गोलंदाजांना कठीण जाईल असं वाटलं होतं. पण या येथेही विजयाचं गणित बरोबर सुटलं. त्यामुळे या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसला. पाकिस्तानचा संघ या सामन्यात कुठेच दिसला नाही. हा सामना प्रत्येक विकेटनंतर भारताच्या पारड्यात झुकत गेला. झालंही तसंच.. भारताने हा सामना धावांनी जिंकला आणि सुपर 8 फेरीत जागा पक्की केली.

अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर पाकिस्तानला दुसरी विकेट काढण्यासाठी खूपच घाम गाळावा लागला. तिथपर्यात हा सामना पाकिस्तानच्या हातून जवळपास गेला होता. दुसऱ्या विकेटसाठी इशान किशन आणि तिलक वर्माने 46 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. यात एकट्या इशान किशनने 38 चेंडूत 76 धावा केल्या.

शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानकडून शेवटचं षटक टाकलं आणि 2 विकेट काढल्या. पण या षटकात 16 धावा आल्या. रिंकु सिंहने चौकार आणि षटकार मारत 10 धावा केल्या. तर शिवम दुबेने 5 धावांची खेळी केली. यामुळे भारताला 175 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या डावात या दोन बाजू जमेच्या ठरल्या. जर 160 धावांच्या आत धावा असता तर पाकिस्तानवर दबाव कमी असता.

पाकिस्तान भारताने दिलेल्या धावांचा सहज पाठलाग करेल असं वाटलं होतं. पण पहिल्याच षटकात गणित बदललं. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने साहीबजादा फरहानची विकेट काढली आणि पाकिस्तानला अडचणीत आणलं.

दुसऱ्या षटकात पाकिस्ताने सावरण्याचा प्रयत्न केला. जसप्रीत बुमराच्या पहिल्याच चेंडूवर सैम आयुबने षटकार मारला. पण त्यानंतर विकेट दिली. त्यानंतर आलेल्या सलमान आगाने चौकार मारला आणि दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानचा पराभव पावरप्लेमध्ये निश्चित झाला.

बाबर आझमच्या रुपाने पाचवी विकेट पडली. त्यानंतर सहाव्या विकेटसाठी उस्मान खान आणि शादाब खानने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी अक्षर पटेलने फोडली आणि पराभव निश्चित झाला. त्यानंतर एका पाठोपाठ एक विकेट पडल्या आणि पाकिस्तान पराभवाच्या दरीत कोसळला.

Follow Us
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार