AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonia Gandhi : दिल्लीतील सोनिया गांधींच्या घरासमोर पोलिसांचा पहारा, दहशतवाद्यांसारखी वागणूक मिळत असल्याचा काँग्रेसचा आरोप

नॅशनल हेराल्डचं कार्यालय सील करणं, काँग्रेस मुख्यालयासमोर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविणं, यातून हिटलरशाहीचं दर्शन होतंय.

Sonia Gandhi : दिल्लीतील सोनिया गांधींच्या घरासमोर पोलिसांचा पहारा, दहशतवाद्यांसारखी वागणूक मिळत असल्याचा काँग्रेसचा आरोप
दिल्लीतील सोनिया गांधींच्या घरासमोर पोलिसांचा पहारा
| Updated on: Aug 03, 2022 | 7:59 PM
Share

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं आज यंग इंडिया लिमिटेडचे कार्यालय सील (Office Seal) केले. हे कार्यालय हेराल्ड हाऊसच्या परिसरातच आहे. ईडीच्या या कारवाईनंतर काँग्रेस मुख्यालयात खळबळ माजली. काँग्रेसचे मोठे नेते काँग्रेस मुख्यालयात पोहचत आहेत. याशिवाय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. यंग इडिया लिमिटेडचं कार्यालय सील झाल्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयराम रमेश (Jairam Ramesh), अजय माकन आणि अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) उपस्थित होते. काँग्रेस मुख्यालयासोबतच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

महागाईविरोधातील प्रदर्शनाला परवानगी नाकारली

जयराम रमेश यांनी सांगितलं, दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा दलानं काँग्रेस मुख्यालय, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर घेराव घातला. अजय माकन म्हणाले, पा ऑगस्टला काँग्रेस महागाईविरोधात राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करणार होती. याची घोषणा शनिवारी करण्यात आली. परंतु, डीसीपींनी प्रदर्शन करण्याला परवानगी दिली नाही. त्यानंतर काँग्रेस मुख्यालय आणि राहुल-सोनिया यांच्या घराला घेराव घालण्यात आला.

काँग्रेसला दहशतवाद्यांसारखी वागणूक

अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, केंद्र सरकारला भीती वाटते की महागाईविरोधात लोकं एकत्र येतील. त्यामुळं भीतीचं वातावरण तयार केलं जातंय. देशातील सर्वात जुन्या पक्षाला दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे.

पोलिसांना घाबरणार नाही

पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविल्यानंतर काँग्रेसनं त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट केलंय. सत्याची आवाज दाबला जाऊ शकत नाही. गांधींचे कार्यकर्ते ही लढाई जिंकतील. नॅशनल हेराल्डचं कार्यालय सील करणं, काँग्रेस मुख्यालयासमोर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविणं, यातून हिटलरशाहीचं दर्शन होतंय.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.