AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे गप्प, कार्यकर्ते संभ्रमात, निवडणुकीच्या तोंडावर मनसेत अस्वस्थता

निवडणुका तोंडावर असताना आता नेमकं करायचं तरी काय? असा प्रश्न मनसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे.

राज ठाकरे गप्प, कार्यकर्ते संभ्रमात, निवडणुकीच्या तोंडावर मनसेत अस्वस्थता
| Updated on: Sep 16, 2019 | 3:32 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं चाललंय तरी काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. ED च्या चौकशीनंतर राज ठाकरे एकदमच शांत झाले आहेत. निवडणूक लढायची की नाही हेच अद्याप निश्चित झालेलं नाही.

राज ठाकरेंच्या भूमिकेनं मनसेचे नेते कार्यकर्तेही वैतागल्याचं चित्र आहे. निवडणुका तोंडावर असताना आता नेमकं करायचं तरी काय? असा प्रश्न मनसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेत अस्वस्थता पसरली आहे.

निवडणूक लढवून उपयोग नाही, ईव्हीम सेट आहे अशी एका गटाची भूमिका आहे, तर दुसऱ्या बाजूला निवडणूक लढवण्यावर एक गट ठाम आहे. निवडणुकीत लोकांसमोर जायलाच हवं अन्यथा लोक रस्त्यावरही फिरू देणार नाहीत, अशीही भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे.

त्यामुळे निवडणुकीवरुनच मनसेचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. गुरूवारी झालेल्या मनसेच्या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायवा नको असं काही नेत्यांच म्हणणं होतं. शिवाय स्वत: राज ठाकरे यांचा सुद्धा निवडणूक न लढवण्याकडे कल आहे.

मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेबद्दल नाराजी आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच मुद्दावरुन मनसेत दोन गट निर्माण झाल्याची चर्चा आहे.

जर निवडणूक न लढवण्याचा निर्णय होत असेल तर मनसेचा मोठा गट वेगळा विचार करण्याची दाट शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेतली खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे.

शरद पवार संपर्क साधणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) हे स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी चर्चा करणार आहेत. मनसेच्या भूमिकेबाबत स्वतः शरद पवार राज ठाकरेंशी बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या 

राज ठाकरे गप्प का? स्वत: शरद पवार जाणून घेणार – सूत्र  

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.