AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावंच्या गावं उद्ध्वस्त झालेले असताना पंचनामे कशाला हवेत? : राजू शेट्टी

शेतकऱ्याला आधाराची गरज असताना मुंबईत सत्तेचा सारीपाट खेळला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on rain affected Farmer) केला आहे.

गावंच्या गावं उद्ध्वस्त झालेले असताना पंचनामे कशाला हवेत? : राजू शेट्टी
| Updated on: Nov 05, 2019 | 11:31 PM
Share

जालना: राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याला झोडपून काढले आहे. यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी मोडून पडला आहे. मात्र, शेतकऱ्याला आधाराची गरज असताना मुंबईत सत्तेचा सारीपाट खेळला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on rain affected Farmer) केला आहे. तसेच गावच्या गावं उद्ध्वस्त झालेले असताना पंचनामा कशाला हवा, असा सवालही त्यांनी (Raju Shetti on rain affected Farmer) उपस्थित केला. ते जालन्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असताना बोलत होते.

राजू शेट्टी मागील 2 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. खर तर संपूर्ण शिवारासह गावच्या गावं अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाली आहेत. अशावेळी पंचनामे कशासाठी मागतात, असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी राजू शेट्टींनी केली. प्रशासनही हा प्रश्न गांभीर्याने घेत नसून सरकारही लक्ष देत नाही, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

शेतकरी मोडून पडलेला असताना मुंबईमध्ये सत्तेचा सारीपाट : राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणाले, “मागील 8 दिवस शासनाने पंचनामे सूरू करण्याचे आदेश दिल्याचं प्रशासन सांगत आहे. मात्र, अजूनही या गावात पंचनामे झालेले नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. मकाला कोंब फुटले आहेत, कापूस सडून चालला आहे. सर्वच पिकांची परिस्थिती अशीच आहे. रब्बीतील ज्वारीचं प्रचंड नुकसान झालं असून यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. असं असताना विमा कंपनी नखरे करत असून वेगवेगळी कागदपत्रे, प्रस्ताव यातच शेतकऱ्यांना गुंतवत आहे.”

शेतकरी मोडून पडला असून त्याला आधारची गरज आहे. सरकारची ती जबाबदारी आहे, पण महाराष्ट्रात सरकारचं अस्तित्वात नाही. मग कोण आधार देणार? शेतकऱ्याला आधाराची गरज असताना हे मुंबईमध्ये सत्तेचा सारीपाट करत बसले आहेत हे खरं दुर्दैव आहे, असंही शेट्टी यांनी नमूद केलं.

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.