AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावंच्या गावं उद्ध्वस्त झालेले असताना पंचनामे कशाला हवेत? : राजू शेट्टी

शेतकऱ्याला आधाराची गरज असताना मुंबईत सत्तेचा सारीपाट खेळला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on rain affected Farmer) केला आहे.

गावंच्या गावं उद्ध्वस्त झालेले असताना पंचनामे कशाला हवेत? : राजू शेट्टी
| Updated on: Nov 05, 2019 | 11:31 PM
Share

जालना: राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याला झोडपून काढले आहे. यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी मोडून पडला आहे. मात्र, शेतकऱ्याला आधाराची गरज असताना मुंबईत सत्तेचा सारीपाट खेळला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on rain affected Farmer) केला आहे. तसेच गावच्या गावं उद्ध्वस्त झालेले असताना पंचनामा कशाला हवा, असा सवालही त्यांनी (Raju Shetti on rain affected Farmer) उपस्थित केला. ते जालन्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असताना बोलत होते.

राजू शेट्टी मागील 2 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. खर तर संपूर्ण शिवारासह गावच्या गावं अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाली आहेत. अशावेळी पंचनामे कशासाठी मागतात, असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी राजू शेट्टींनी केली. प्रशासनही हा प्रश्न गांभीर्याने घेत नसून सरकारही लक्ष देत नाही, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

शेतकरी मोडून पडलेला असताना मुंबईमध्ये सत्तेचा सारीपाट : राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणाले, “मागील 8 दिवस शासनाने पंचनामे सूरू करण्याचे आदेश दिल्याचं प्रशासन सांगत आहे. मात्र, अजूनही या गावात पंचनामे झालेले नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. मकाला कोंब फुटले आहेत, कापूस सडून चालला आहे. सर्वच पिकांची परिस्थिती अशीच आहे. रब्बीतील ज्वारीचं प्रचंड नुकसान झालं असून यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. असं असताना विमा कंपनी नखरे करत असून वेगवेगळी कागदपत्रे, प्रस्ताव यातच शेतकऱ्यांना गुंतवत आहे.”

शेतकरी मोडून पडला असून त्याला आधारची गरज आहे. सरकारची ती जबाबदारी आहे, पण महाराष्ट्रात सरकारचं अस्तित्वात नाही. मग कोण आधार देणार? शेतकऱ्याला आधाराची गरज असताना हे मुंबईमध्ये सत्तेचा सारीपाट करत बसले आहेत हे खरं दुर्दैव आहे, असंही शेट्टी यांनी नमूद केलं.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.