AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : सरपंच आरक्षणाची सोडत कधी?, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात….

एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदाचं आरक्षण काढू, असं वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : सरपंच आरक्षणाची सोडत कधी?, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात....
हसन
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 18, 2021 | 4:11 PM
Share

कोल्हापूर :  राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. यानंतर आता पॅनेल प्रमुखांपासून ते सदस्यांपर्यंत सगळ्यांनाच सरपंचपदाच्या आरक्षणाचे वेध लागले आहेत. अशातच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदाचं आरक्षण काढू, असं वक्तव्य केलं आहे. पुढच्या एक महिन्यात हे आरक्षण काढलं जाईल, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. (Reservation of Sarpanch post within 1 month after election result Says minister hasan Mushriff)

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.  या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. बाकीच्या ग्रामपंचायतीचेही निकाल लागले आहेत. कुठे अनपेक्षित निकाल आहेत तर कुठे अनेकांची अनेक वर्षांची सत्ता गेलीय. कुठे सासू-सूनांमध्ये काँटे की टक्कर झालीये तर कुठे जावा-जावांमध्ये शर्यत पाहायला मिळाली.

निवडणुकीच्या अगोदर सरपंचपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. मात्र निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने हे आरक्षण रद्द करत निवडणुकीनंतर आरक्षणाची सोडत काढली काढण्याचा निर्णय घेतला.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच्या सोडतीवर सविस्तर भाष्य केलं. तसंच राजकीय फटकेबाजीही केली.  नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे आणि त्यानंतर आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र सांभाळायला पाहिजे, असं म्हणत त्यांनी चंद्रकांतदादांना टोला लगावला.

चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात भाजपची धुळधाण झाली आहे. मतदारांनी भाजप उमेदवारांना नाकारलं आहे. पर्यायाने चंद्रकांत पाटलांना हा मोठा धक्का मानण्यात येतोय. तसंच संबंध राज्यभर चंद्रकांत पाटलांच्या गावात त्यांना सत्ता राखता आली नसल्याची चर्चा होतीय. याचाच संदर्भ घेत “उद्या भाजपचेच नेते म्हणतील दादा तुमच्याच गावात तुमची सत्ता नाही”, अशी कोपरखळी मुश्रीफांनी मारली.

चंद्रकांतदादांच्या खानापुरात शिवसेनेनं बाजी मारली. तसंच भाजपच्या अनेक दिगग्ज नेत्यांच्या गावात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर राज्याच्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर हे लक्षात येईल की महाविकास आघाडीची सरशी झाली आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

(Reservation of Sarpanch post within 1 month after election result Says minister hasan Mushriff)

हे ही वाचा

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | हर्षवर्धन जाधवांच्या मुलाची आईविरुद्ध लढत, औरंगाबादच्या लढतीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : शिवसेना-भाजपला जोरदार टक्कर, मनसेचा ‘या’ ग्रामपंचायतीवर झेंडा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: गावगाड्याची सत्ता कुणाच्या हाती?; ठाकरे, पवार, चव्हाण, चंद्रकांतदादा काय म्हणाले?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?