AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपतींसमोर सगळेच नतमस्तक, ‘आज के शिवाजी…’ वादावर ‘सामना’तून पडदा

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकावरुन महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरुन काढू नयेत ही अपेक्षा 'सामना'तून व्यक्त करण्यात आली आहे.

छत्रपतींसमोर सगळेच नतमस्तक, 'आज के शिवाजी...' वादावर 'सामना'तून पडदा
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 15, 2020 | 8:20 AM
Share

मुंबई : शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी आणि शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे, असा इशारा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी काल पत्रकार परिषदेत शिवसेनेवर तोफ डागल्यानंतर सामनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र ‘वाद संपला! छत्रपतींसमोर सारेच नतमस्तक’ अशा मथळ्याखाली शिवसेनेनेच वादावर पडदा (Saamana on Aaj Ke Shivaji) घातला आहे.

‘शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न जेव्हा जेव्हा उभा राहिला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र खडबडून जागा झाला आणि पेटून उठला. पंडित नेहरु असतील, नाहीतर मोरारजी देसाई, सगळ्यांनाच शिवरायांपुढे नतमस्तक व्हावे लागले. आताही तेच झाले. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरुन महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरुन काढू नयेत ही अपेक्षा ‘सामना’तून व्यक्त करण्यात आली आहे.

फुटकळ लेखकाला भाजपमधून एव्हाना हाकलून का दिले नाही? असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे. गोयल याला जे ओळखतात ते ठामपणे सांगू शकतात, की हा माणूस खोट्या प्रसिद्धीसाठी भुकेला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आता असे जाहीर केले आहे की जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात पाठवू. अशा वक्तव्यांमुळे लोकांच्या भडकलेल्या भावना आणखी पेटतात. असं असेल तर भाजप कार्यालयात नरेंद्र मोदी हेच शिवाजी असे सांगणाऱ्या लेखकावर त्याच कायद्याने कारवाई का झाली नाही? कारण याच कारणामुळे राज्यातील वातावरण पेटलं आहे. ते प्रकरण भीमा कोरेगाव दंगलीसारखे होऊ नये हीच आमची अपेक्षा, असंही पुढे ‘सामना’त म्हटलं आहे.

‘सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार हे ‘जाणता राजा’ कसे? हा बाळबोध प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारावा. कारण शिवराय रयतेचे राजे होते. तर जनतेच्या प्रश्नांबाबत आणि भावनांबाबत खडान्-खडा माहिती असलेले पवार हे जाणते राजे असल्याचं नरेंद्र मोदींनीही मान्य केलं आहे.’ असं सामनात म्हटलं आहे.

उदयनराजेंचा हल्लाबोल

शिवसेना या नावाला कधी आम्ही हरकत घेतली नाही, पण आता शिवसेना नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा, असं चॅलेंज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला दिलं आहे. दादरमधील शिवसेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वर का? असा सवालही उदयनराजेंनी केला होता.

Saamana on Aaj Ke Shivaji

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक