AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं, सदाभाऊंचा आरोप; शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल

राज्यातील साखर सम्राटांचे नेतृत्व शरद पवार यांनी केले. दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे अहवाल निती आयोगाकडे दिले. आमचा साखर सम्राटांवर विश्वास नाही, अशा शब्दात खोत यांनी पवारांवर जोरदार टीका केलीय.

दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं, सदाभाऊंचा आरोप; शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
सदाभाऊ खोत, माजी मंत्री
| Edited By: sagar joshi | Updated on: Oct 05, 2021 | 3:26 PM
Share

सोलापूर : ऊसाच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी या मागणीसाठी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज्यातील साखर सम्राटांचे नेतृत्व शरद पवार यांनी केले. दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे अहवाल निती आयोगाकडे दिले. आमचा साखर सम्राटांवर विश्वास नाही, अशा शब्दात खोत यांनी पवारांवर जोरदार टीका केलीय. (Agitation in Solapur led by Sadabhau Khot on the issue of sugarcane FRP)

शरद पवार यांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मरगीचे अश्रू पुसण्याचे काम आहे. एकीकडे शतकऱ्यांना शेतमाल विकण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असा उल्लेख शरद पवारांच्या आत्मचरित्रात आहे. मात्र, करार शेतीचा पहिला प्रयोग 2005 मध्ये शरद पवार यांनी आणला. करार शेतीचा सगळ्यात जास्त फायदा बारामती अॅग्रोला झाला. तिथे उभारलेलं वैभव हे याच कायद्या अंतर्गत आहे. पोट भरल्यानंतर दुसऱ्यानं जेवण करु नये म्हणून ते कडू आहे असा सांगण्यासाखरा प्रकार आहे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी पवारांना लगावला आहे.

सहकार, साखर सम्राटांवर हल्लाबोल

आंदोलनापूर्वी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी विविध मुद्द्यांवरुन पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. शुगरकेन अॅक्टनुसार ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. मात्र निती आयोगाला तीन टप्प्यात पैसे देण्याची सूचना केली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे. सहकार आणि साखर सम्राटांनी मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माती करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप सदाभाऊंनी केलाय.

‘महाविकास आघाडी सरकार म्हणजे सर्कस’

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक सर्कस आहे. या सर्कशीतले सगळेच विदूषक आहेत. सर्कशीतल्या विदूषकाप्रमाणे हे लोक महाराष्ट्रातील जनतेची खिल्ली उडवत आहेत. 2019 च्या जीआर नुसारच महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, अशी मागणी खोत यांनी केलीय.

‘दोषी असेल त्याल फासावर लटकवा’

लखीमपूर हिंसाचारावर बोलताना बळीराजा हा अन्नदाता आहे. त्याच्यावर अन्याय झाला तर न्याय मागण्याचा त्याला अधिकारी आहे. सत्तेचा उन्मान कुणावला येत असेल, शेतकऱ्यांच्या रक्ताचा सडा कुणी पाडत असेल तर ते चालणार नाही. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. दोषी असतील त्याला फासावर लटकवण्याची मागणी यावेळी सदाभाऊ खोत यांनी केलीय.

इतर बातम्या :

Amravati DCC Bank Election : अमरावती जिल्हा बँक निवडणूक; विजयानंतर बच्चू कडूंची पाहिली प्रतिक्रिया

दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत द्या, फडणवीस आक्रमक; आंदोलनाचाही इशारा

Agitation in Solapur led by Sadabhau Khot on the issue of sugarcane FRP

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक