AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं, सदाभाऊंचा आरोप; शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल

राज्यातील साखर सम्राटांचे नेतृत्व शरद पवार यांनी केले. दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे अहवाल निती आयोगाकडे दिले. आमचा साखर सम्राटांवर विश्वास नाही, अशा शब्दात खोत यांनी पवारांवर जोरदार टीका केलीय.

दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं, सदाभाऊंचा आरोप; शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
सदाभाऊ खोत, माजी मंत्री
| Edited By: sagar joshi | Updated on: Oct 05, 2021 | 3:26 PM
Share

सोलापूर : ऊसाच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी या मागणीसाठी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज्यातील साखर सम्राटांचे नेतृत्व शरद पवार यांनी केले. दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे अहवाल निती आयोगाकडे दिले. आमचा साखर सम्राटांवर विश्वास नाही, अशा शब्दात खोत यांनी पवारांवर जोरदार टीका केलीय. (Agitation in Solapur led by Sadabhau Khot on the issue of sugarcane FRP)

शरद पवार यांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मरगीचे अश्रू पुसण्याचे काम आहे. एकीकडे शतकऱ्यांना शेतमाल विकण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असा उल्लेख शरद पवारांच्या आत्मचरित्रात आहे. मात्र, करार शेतीचा पहिला प्रयोग 2005 मध्ये शरद पवार यांनी आणला. करार शेतीचा सगळ्यात जास्त फायदा बारामती अॅग्रोला झाला. तिथे उभारलेलं वैभव हे याच कायद्या अंतर्गत आहे. पोट भरल्यानंतर दुसऱ्यानं जेवण करु नये म्हणून ते कडू आहे असा सांगण्यासाखरा प्रकार आहे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी पवारांना लगावला आहे.

सहकार, साखर सम्राटांवर हल्लाबोल

आंदोलनापूर्वी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी विविध मुद्द्यांवरुन पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. शुगरकेन अॅक्टनुसार ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. मात्र निती आयोगाला तीन टप्प्यात पैसे देण्याची सूचना केली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे. सहकार आणि साखर सम्राटांनी मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माती करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप सदाभाऊंनी केलाय.

‘महाविकास आघाडी सरकार म्हणजे सर्कस’

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक सर्कस आहे. या सर्कशीतले सगळेच विदूषक आहेत. सर्कशीतल्या विदूषकाप्रमाणे हे लोक महाराष्ट्रातील जनतेची खिल्ली उडवत आहेत. 2019 च्या जीआर नुसारच महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, अशी मागणी खोत यांनी केलीय.

‘दोषी असेल त्याल फासावर लटकवा’

लखीमपूर हिंसाचारावर बोलताना बळीराजा हा अन्नदाता आहे. त्याच्यावर अन्याय झाला तर न्याय मागण्याचा त्याला अधिकारी आहे. सत्तेचा उन्मान कुणावला येत असेल, शेतकऱ्यांच्या रक्ताचा सडा कुणी पाडत असेल तर ते चालणार नाही. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. दोषी असतील त्याला फासावर लटकवण्याची मागणी यावेळी सदाभाऊ खोत यांनी केलीय.

इतर बातम्या :

Amravati DCC Bank Election : अमरावती जिल्हा बँक निवडणूक; विजयानंतर बच्चू कडूंची पाहिली प्रतिक्रिया

दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत द्या, फडणवीस आक्रमक; आंदोलनाचाही इशारा

Agitation in Solapur led by Sadabhau Khot on the issue of sugarcane FRP

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?