AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावरकरांविषयी पुस्तक देऊन राहुल गांधींचे गैरसमज दूर करा, संजय राऊत यांचा महाराष्ट्र काँग्रेसला सल्ला

स्वतः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांवर टपाल तिकीट त्या काळी काढलं होतं', अशी आठवणही संजय राऊत यांनी करुन दिली होती.

सावरकरांविषयी पुस्तक देऊन राहुल गांधींचे गैरसमज दूर करा, संजय राऊत यांचा महाराष्ट्र काँग्रेसला सल्ला
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 15, 2019 | 1:32 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन सावरकरांविषयीचे त्यांचे गैरसमज दूर करावेत, त्यांना अनुवादित पुस्तक भेट द्यावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Rahul Gandhi Sawarkar Statement) यांनी दिला आहे. राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.

‘सावरकरांसारखा त्याग करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. वीर सावरकरांबद्दल मनमोहन सिंह यांनीही दोन महिन्यांपूर्वी वक्तव्य केलं होतं. सावरकरांच्या विचारांबद्दल मतभेद असूही शकतात, सावरकरांची विचारधारा, भूमिका पटत नसतीलही, पण त्यांनी केलेला त्याग हा मोलाचा आहे, हे मनमोहन सिंह यांनी मान्य केलं होतं. स्वतः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांवर टपाल तिकीट त्या काळी काढलं होतं’, अशी आठवणही संजय राऊत यांनी करुन दिली होती.

‘जेव्हा पंडित नेहरुंबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते बोलतात तेव्हा आम्ही नेहरुंच्या बाजूने उभे राहतो. कारण स्वातंत्र्य चळवळीत नेहरुंचं योगदान आहे, महात्मा गांधीचं आहे, सरदार वल्लभ भाई पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचंही आहे. त्याच पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचंही राहणार. सावरकर हे स्वाभिमान आणि राष्ट्राभिमान याचं दुसरं नाव आहे. आजही तरुणांना सावरकरांमुळे प्रेरणा मिळते’, असं राऊत म्हणाले.

वीर सावरकारांचा विषय हा स्वतंत्र आहे. एखादा नेता कोणाविषयी काय बोलतो, यावर हे सरकार टिकणार की नाही, हे अवलंबून नाही. सरकार अन्न वस्त्र निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, इन्फ्रास्ट्रक्चर या प्रमुख विषयांवर काम करत आहे, असंही राऊतांनी सांगितलं.

भाजपला सावरकरांविषयी पुळका आहे, हे ढोंग आहे. साडेपाच वर्ष केंद्रात तुमचं सरकार आहे. मी सतत वीर सावरकारांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, अशी मागणी करतोय. पण तुम्ही काय केलं? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. मुंबईतील समुद्र तिरावरील सावरकरांचं स्मारक हे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने आणि सहभगामुळे झालं, एवढंच मी सांगू शकतो, असंही राऊत पुढे म्हणाले.

मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे : राहुल गांधी

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी एकामागून एक ट्वीट करत काँग्रेसला इशारा दिला होता.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

‘मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही’, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला होता. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधत भारतात ‘मेक इन इंडिया’ नसून ‘रेप इन इंडिया’ झाल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्याचा भाजपकडून लोकसभेत निषेध करण्यात आला होता. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली होती. यावर राहुल गांधींनी प्रत्युत्तर देताना सावरकरांविषयी वक्तव्य केलं.

Sanjay Raut on Rahul Gandhi Sawarkar Statement

Follow Us
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा