AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार माझ्या जीवाशी खेळतंय, उद्या मला काही झालं तर… संजय राऊत यांचा राज्य सरकारला इशारा

मी जिथे बसतो तिथली सुरक्षा काढली. तुरुंगातूनबाहेर जाताना आणि येताना मला सर्वाधिक सुरक्षा देण्यात येत होती. काही तरी होईल हे माहीत होतं. म्हणून सुरक्षा दिली होती.

सरकार माझ्या जीवाशी खेळतंय, उद्या मला काही झालं तर... संजय राऊत यांचा राज्य सरकारला इशारा
सरकार माझ्या जीवाशी खेळतंय, उद्या मला काही झालं तर...Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2022 | 12:50 PM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यावरून संजय राऊत याांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. माझ्या जीवाला धोका आहे. हे सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. उद्या मला काही झालं तर त्याला हे सरकारच जबाबदार असेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

माझ्या घराची रेकी होते हे पोलिसांकडून कळलं आहे. मुंबईतील झालेल्या दंगलीपासून मला सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. 25 ते 30 वर्ष मला सुरक्षा पुरवण्यात आली होती. पण ही सुरक्षा या सरकारने काढून घेतली. आम्ही मागितली नाही. मागणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

मी सामनात बसतो. मी जिथे बसतो तिथली सुरक्षा काढली. तुरुंगातूनबाहेर जाताना आणि येताना मला सर्वाधिक सुरक्षा देण्यात येत होती. काही तरी होईल हे माहीत होतं. म्हणून सुरक्षा दिली होती. तरीही माझी सुरक्षा काढली. याचा अर्थ सरकार माझ्या जीवाशी खेळतंय.

पण काही झालं तरी मी सरकारडे सुरक्षा मागणार नाही. कोणत्या नियमाने आणि कोणत्या भूमिकेतून सुरक्षा कोढली? माझी सुरक्षा काढण्याची शिफारस करण्याची शिफारस करणारी ही कोणती कमिटी आहे? कशासाठी सुरक्षा काढली?, असा सवाल त्यांनी केला.

एका क्षणात माझी सुरक्षा काढली. कोणत्या कारणाने काढली मला माहीत नाही. माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार राहील. हे सुडबुद्धीने झालं आहे. आम्ही काम करू नये असं त्यांना वाटतं. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही आमचं काम करत राहू, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या इशाऱ्याचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी समाचार घेतला आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तिच्या सुरक्षेबाबत आढावा समिती निर्णय घेत असते. त्यात राज्य सरकारचा संबंध नसतो. त्यामुळे संजय राऊत यांनी ओरड करू नये. जेव्हा आमची सुरक्षा काढली तेव्हा हेच संजय राऊत आम्हाला ज्ञान देत होते. आता त्यांनी इतरांना सामान्य ज्ञान द्यावे असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लागावला आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...