AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात तडजोड करूनच युती करावी लागते, प्रकाश आंबेडकरांना शिंदे गटाच्या आमदाराचा सल्ला?

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यादरम्यान युतीच्या चर्चा सुरु असतानाच आज अचानक आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची माहिती समोर आली.

राजकारणात तडजोड करूनच युती करावी लागते, प्रकाश आंबेडकरांना शिंदे गटाच्या आमदाराचा सल्ला?
Image Credit source: social media
| Updated on: Jan 12, 2023 | 2:18 PM
Share

मुंबईः वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिंदे गटाची युती होणार की नाही, यावर स्वतः प्रकाश आंबेडकर यांनीच पडदा पाडला. मला शिवसेनेचं (Shivsena) वावडं नाही, पण शिंदे गट भाजपासोबत असल्याने एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) युतीचा प्रश्न येत नाही, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय. मात्र यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट प्रकाश आंबेडकरांनाच सल्ला दिलाय. राजकारणात कुठेतरी तडजोड करावी लागते. तडजोडीनंतरच युती होत असते, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.

बाळासाहेबांची शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकर यांना युती करायची आहे. मात्र कोणाबरोबर करायची हे त्यांनी ठरवले पाहिजे.. उध्दव ठाकरे यांच्या बरोबर युती करण्यासाठी राष्ट्रवादी नको.. आमच्या बरोबर युती करण्यासाठी भाजप नको असे त्याचे मत आहे. त्यामुळे त्यांनी लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यादरम्यान युतीच्या चर्चा सुरु असतानाच आज अचानक आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची माहिती समोर आली. या भेटीनंतर शिंदे-आंबेडकर युतीच्या चर्चा सुरु झाल्या.

ही युती झाली तर उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा बसेल, अशी शक्यता वर्तवल्या जाऊ लागली. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच यासंबंधीचं स्पष्टीकरण दिलं.

उद्धव ठाकरे आणि आमच्यात चार भिंतीत एक कमिटमेंट झाली आहे. यात जागा वाटपावरही चर्चा झाली आहे. आमच्यात युती ठरली आहे, फक्त ती पब्लिकली जाहीर कधी करायची हे उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.