AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी, शाहांना माझ्याशिवाय राहावत नाही, ते झोपेतसुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते झोपेतसुद्धा माझं नाव घेतात", अशी खोचक टीका शरद पवारांनी मोदी-शहांवर (Sharad pawar criticism on modi) केली.

मोदी, शाहांना माझ्याशिवाय राहावत नाही, ते झोपेतसुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
| Edited By: | Updated on: Oct 15, 2019 | 9:48 PM
Share

पुणे : “गृहमंत्री अमित शाह येथे येऊन आम्हाला विचारतात की तुम्ही काय केल. मात्र मी तुम्हाला विचारतो की तुम्ही पाच वर्षांपूर्वी अमित शाहांचं नाव तरी ऐकलं होतं का?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad pawar criticism on modi) यांनी विचारला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते झोपेतसुद्धा माझं नाव घेतात”, अशी खोचक टीका शरद पवारांनी मोदी-शहांवर (Sharad pawar criticism on modi) केली.

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान, गृहमंत्री राज्यात सभा घेत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राज्यात हिंडत आहे, ही देशातील मोठी मंडळी येथे का आणली? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुनही सरकारवर निशाणा साधला. “राज्यात आतापर्यंत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यांनी कलम 370 हटवलं. तुमच्यापैकी कोण तिथे शेती करायला जाणार आहे. यांच्याकडे सांगायला काही नाही, म्हणून कलम 370 हटवलं असं सांगतात. शेतकरी आत्महत्या, कारखाना बंद, महिला अत्याचार यावर फक्त 370 कलम इतकचं सांगितलं जात आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.

“राज्यात शेतीला पाणी नाही, शेतमाल दर नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला, जप्ती येत असल्यानं चिंतेने शेतकरी आत्महत्या करत आहे. मात्र संकटात त्यांना मदत केली पाहिजे,” असेही शरद पवार म्हणाले.

“आम्ही काय केलं हे जनतेला माहीत आहे. मराठा विद्यापीठ नामांतर विषय घेतला. मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी केली. ओबीसी सन्मान वागणूक संधी दिली. महिला आरक्षण दिलं, त्यांचा सन्मान केला. 33 टक्के आरक्षण निर्णय घेतला. अशा अजून किती गोष्टी सांगू,” असेही शरद पवार म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची आणि आंबेडकर स्मारक एक वीट उभी केली नाही. शिवाजी महाराजांचे नावं घेता. मात्र किल्ले लग्न, पर्यटनसाठी जाहीर केले, मग तिथं बार सुरु होईल, तिथं छम छम व्यवस्था करता अशी टीका शरद पवारांनी केली. जिथं शौर्य होते तिथं बार करणार का?” असा प्रश्नही पवारांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...