AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्राचाळ आरोप प्रकरणी शरद पवार यांचं विरोधकांना आव्हान, आरोप खोटे ठरल्यास…

शरद पवारांवर काल पत्राचाळ प्रकरणी आरोप केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आरोपांना उत्तर देत, विरोधकांना आव्हान देखील दिले आहे.

पत्राचाळ आरोप प्रकरणी शरद पवार यांचं विरोधकांना आव्हान, आरोप खोटे ठरल्यास...
पवार कुटुंबाचं विसर्जन करणारा जन्माला यायचाय; राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपला ललकारलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2022 | 2:22 PM
Share

मुंबई :  आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी पत्रचाळ प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.  पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा. मात्र आरोप खोटे ठरल्यास काय करणार तेही स्पष्ट करा असं थेट आव्हानच शरद पवार यांनी सरकारला दिलं आहे. पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकर करा मात्र पराचा कावळा करू नका असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शदर पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये जोरदार फटकेबाजी केली आहे. पत्रचाळ प्रकरणावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.  पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा. पण पराचा कावळा करू नका असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पत्रचाळ प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आरोप खोटे ठरल्यास काय करणार तेही सरकारनं स्पष्ट करावं असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

यावेळी शरद पवार यांनी दसरा मेळाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.  वाद वाढू नये याची जबाबदारी ही राज्याच्या प्रमुखाची असते असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत मविआला मोठं यश

दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात मविआला मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. मविआला एकूण 173 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला. तर भाजप आणि शिंदे गट यांना एकत्रित 210 जागांवर विजय मिळवता आला असं पवार यांनी म्हटलं आहे.

मात्र दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आम्हालाच सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.