AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना-भाजप युतीची पत्रकाद्वारे घोषणा, फॉर्म्युला गुलदस्त्यात

अखेर शिवसेना-भाजप युतीच्या (Shivsena BJP Alliance) निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.

शिवसेना-भाजप युतीची पत्रकाद्वारे घोषणा, फॉर्म्युला गुलदस्त्यात
| Updated on: Sep 30, 2019 | 8:28 PM
Share

मुंबई: अखेर शिवसेना-भाजप युतीच्या (Shivsena BJP Alliance) निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महायुती होणार असल्याच्या निर्णयाबाबत एक पत्र प्रकाशित करुन माहिती देण्यात आली आहे. यात भारतीय रिपब्लिकन पक्ष (RPI), राष्ट्रीय समाज पक्ष (RSP), शिवसंग्राम (Shivsangram) आणि रयतक्रांती (Rayatkranti) या पक्षांचाही समावेश आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या नेतृत्वात युतीची घोषणा करणारे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पत्रकार परिषदेऐवजी शिवसेना-भाजपने पत्रकाद्वारे युतीची घोषणा केली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूर येथील पत्रकार परिषदेत युतीचा निर्णय झाल्याचं सांगितलं.

Shivsena BJP Alliance letter

शिवसेनेच्या 50-50 च्या फॉर्म्युल्याचं काय होणार?

युतीची घोषणा झालेली असली तरी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याचं चित्र आहे. लवकरच युतीचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) जाहीर करु असंही सांगण्यात आलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तातडीने शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. शिवसेना आधीपासून 50-50 च्या फॉर्म्युल्याप्रमाणे जागांची मागणी करत आहे. मात्र भाजपची याला तयारी नसल्याचं दिसत आहे.

मागील काही काळात भाजपमध्ये आयारामांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे भाजपसमोर पक्षातील इच्छुक आणि आयाराम यापैकी कुणाला उमेदवारी द्यायची हा मोठा पेच तयार झाला आहे. त्यामुळेच भाजप शिवसेनेकडे अधिक जागांची मागणी करत 50-50 च्या फॉर्म्युल्याला नकार देत असल्याचं बोललं जात आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) ठरला असून त्याची केवळ अधिकृत घोषणाच बाकी असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेने देखील बैठक बोलावल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election) सोमवारचा (30 सप्टेंबर) दिवस शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. आदित्य ठाकरेंनी वरळी (Aditya Thackeray from Worli) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वरळीतून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक (Shivsena Important meeting) बोलावली आहे. यात जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.