AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंधुदुर्गाच्या वाट्याचे मंत्रिपद गेले, दीपक केसरकरांच्या नाराजीवर विनायक राऊत म्हणतात…..

उदय सामंत यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. | Vinayak Raut

सिंधुदुर्गाच्या वाट्याचे मंत्रिपद गेले, दीपक केसरकरांच्या नाराजीवर विनायक राऊत म्हणतात.....
| Updated on: Nov 07, 2020 | 1:06 PM
Share

सिंधुदुर्ग: मला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, पण सिंधुदुर्गाच्या वाटचे मंत्रिपद गेले, अशी खंत बोलून दाखवणारे शिवसेना नेते दीपक केसरकर यांना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार उदय सामंत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे, ते पालकमंत्रीही आहेत. उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपूत्र आहेत, असा प्रतिवाद विनायक राऊत यांनी केला. (Shivsena MP Vinayak Raut reply to Deepak Kesarkar)

काही दिवसांपूर्वीच दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील पत्रकारपरिषदेत आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखविली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान नसल्यामुळे आपण नाराज आहोत. मला नाही निदान वैभव नाईक यांना तरी मंत्रिपद मिळायला पाहिजे होते, असे वक्तव्य करुन केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दीपक केसरकर यांचा आरोप खोडून काढला. उदय सामंत यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. उदय सामंत वेंगुर्ल्याचे असल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडेच आहे. मात्र, दीपक केसरकर यांची नेमकी काय भूमिका आहे, ते माहीत नाही. पण त्यांच्या मनात काही शंका असतील तर आम्ही त्यावर नक्की बोलू. या सगळ्यावर मार्ग काढण्यात येईल, असे विनायक राऊत यांनी सांगितले.

यापूर्वी फडणवीस सरकारमध्ये केसरकर गृह राज्यमंत्री होते. मात्र, महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर केसकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे दीपक केसरकर सत्ताकेंद्रापासून दूर फेकले गेले होते. तेव्हापासून दीपक केसरकर तेव्हापासून जवळपास राजकीय अज्ञातवासात गेले होते. मात्र, सावंतवाडीतील पत्रकारपरिषदेत त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. राज्यात युतीची सत्ता असताना मला पंतप्रधान कार्यालयात बोलावून भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली होती. गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ही बाब माहिती आहे. पण तेव्हा मी भाजपमध्ये गेलो नाही, असे केसरकर यांनी बोलून दाखवले होते.

उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर

मी शिवसेनेमध्ये का गेलो, तर ज्यावेळी मी नारायण राणेंविरुद्ध लढलो आणि माझी ताकद दाखवली, तेव्हा सगळ्या मोठमोठ्या पक्षांच्या मला ऑफर होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. असं कोणीच करत नाही. ज्यांनी पदं दिलं, त्यांच्याशी तरी प्रामाणिक राहायला हवं, असे दीपक केसरकर यांनी म्हटले होते. त्यामुळे केसरकरांच्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. मला मंत्रिपद दिल्यास तीन वर्षात चांदा ते बांदा विकास करुन मी राजीनामा दिला असता आणि वैभव नाईक यांना मंत्रिपद देण्याची विनंती उद्धव ठाकरेंना केली असती, असेही केसरकर यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

महाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकरांच्या नाराजीची चर्चा

अशोक चव्हाण किंवा दीपक केसरकरांची नाराजी काहीतरी पदरात पाडण्यासाठी, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर

(Shivsena MP Vinayak Raut reply to Deepak Kesarkar)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.