AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून मी भगवे नाही तर पांढरे कपडे घालतो; पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शेतकरी, मतदार, हिंदूत्वाशी कुणी गद्दारी केली हे सगळ्यांना माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

...म्हणून मी भगवे नाही तर पांढरे कपडे घालतो; पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंचे डुप्लीकेट विजय मानेंची हायकोर्टात धावImage Credit source: social media
| Updated on: Sep 21, 2022 | 7:55 AM
Share

मुंबई :  पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना ( Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. शेतकरी, मतदार, हिंदूत्वाशी कुणी गद्दारी केली हे सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मला पत्रकरांनी विचारले तुम्ही भगवे कपडे का घालत नाहीत? पांढरे कपडे का घातला? तेव्हा त्यांना मी सांगितले की भगवा आमच्या हृदयात आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं मुख्यमंत्र्यांनी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिंदूत्व, शेतकरी, मतदार यांच्याशी कोणी गद्दारी केली हे सर्वांना माहिती आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय.

पुढे बोलताना ते म्हणाले की मला एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारले तुम्ही भगवे कपडे का घातल नाहीत? पांढरे का घालतात तेव्हा मी त्यांना उत्तर दिले भगवा हा आमच्या  हृदयात आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

आम्ही बाळासाहेंबाच्या विचाराचे पाईक आहोत, आणि त्यांचाच विचार पुढे घेऊन जात असल्याचंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

शिंदे गट, शिवसेना आमने-सामने

अनेकदा शिंदे गट आणि शिवसैनिक आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजाकारण चांगलेच तापले होते. रामदास कदम यांच्या या वक्तव्याला शिवसैनिकांकडून आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

दुसरीकडे वेदांतावरून देखील विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. वेदातांवरून देखील शिंदे गटाकडून शिवसेनेवर अनेक आरोप करण्यात आले आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.