AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजभाऊ, तुम्ही 360 डिग्रीत फिरत आहात, सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?

छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांबद्दल तुम्ही ठामपणे वक्तव्य करू शकत नाहीत, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.

राजभाऊ, तुम्ही 360 डिग्रीत फिरत आहात, सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 28, 2022 | 8:52 AM
Share

प्रदीप कापसे, मुंबईः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अख्य्या भाषणाचा गोषवारा काढला तर एकाच वाक्यात सांगता येईल. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात…असं होतं…  ते भाजपाविरोधात (BJP) बोलू शकत नाहीत. त्यांनी आजवर केलेली आंदोलनं निरर्थक असल्याने ते 360 डिग्रीत फिरत आहेत. अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली. गोरेगाव येथील मनसे गटनेत्यांच्या मेळाव्याला काल राज ठाकरे यांनी संबोधित केलं. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली. एकूणच राज ठाकरे यांची आंदोलन आणि त्यांच्या भूमिकांना अर्थ नाही, असा आरोप करताना सुषमा अंधारेंनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल मला वाईट वाटत नाही. इतर राज्यही संघराज्य पद्धतीतील आहे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. त्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, असं असेल तर तुमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेने ऐवजी संघराज्य नवनिर्माण सेना करा ना…

टोलचं आंदोलन केलं. जो माणूस 25 लाखाची गाडी वापरू शकतो, तो 50रुपयांचा टोल भरूच शकतो. त्यामुळे टोलनाक्यांचं आंदोलन करण्यापेक्षा रस्ते नीट आहेत का, हे आंदोलन बघा, असा कानमंत्र सुषमा अंधारे यांनी दिला.

वडापावची गाडी हटवा, टॅक्सीवाल्यांचं आंदोलन करायचं, यापेक्षा गुज्जू बिल्डरांनी जे अतिक्रमण केलं, यावर राज ठाकरे चकार शब्द बोलत नाहीत. त्यामुळे ते 360डिग्री फिरत आहेत, असंच वाटतंय..

एकनाथ शिंदेंनी जादूची कांडी फिरवलं आणि घरात बसलेले मुख्यमंत्री बाहेर निघाले… अशी टीका राज ठाकरेंनी केली. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, या सगळ्यांवर बोलण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचं काय नवनिर्माण करणार आहात, हे पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांबद्दल तुम्ही ठामपणे वक्तव्य करू शकत नाहीत, ज्या देवेंद्रजींनी मनसे म्हणजे मतदार नसलेला सेना… अशी टीका केली, त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकत नाहीत. तुम्ही फक्त भावकीत भांडण करू शकता, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Follow Us
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.