AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांनी विधानसभेबाहेर दाखवलेले खावटी अनुदान योजेनचं किट बनावट, आदिवासी विकासमंत्र्यांचा दावा

खावटी अनुदान योजनेतून आदिवासींना अतिश्य निकृष्ट दर्जाच्या वस्तू दिल्या जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यावेळी त्यांनी काही खाद्यपदार्थही दाखवले होते. फडणवीसांच्या याच आरोपाला आता आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीसांनी विधानसभेबाहेर दाखवलेले खावटी अनुदान योजेनचं किट बनावट, आदिवासी विकासमंत्र्यांचा दावा
देवेंद्र फडणवीस, के. सी. पाडवी
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 6:01 PM
Share

नंदूरबार : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या राड्यानंतर 12 भाजप आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर भाजपनं विधानसभेबाहेरच प्रति विधानसभा भररवली. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागावर जोरदार टीका केली होती. खावटी अनुदान योजनेतून आदिवासींना अतिश्य निकृष्ट दर्जाच्या वस्तू दिल्या जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यावेळी त्यांनी काही खाद्यपदार्थही दाखवले होते. फडणवीसांच्या याच आरोपाला आता आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाडवी यांच्या हस्ते आज नंदूरबार जिल्ह्यात खावटी अनुदान योजने अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना किटचं वाटप करण्यात आलं. (Tribal Development Minister K. C. Padvi’s reply to Devendra Fadnavis)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेबाहेर दाखवलेले खावटी अनुदान योजनेचे किट बनावट असल्याचा दावा के. सी. पाडवी यांनी केलाय. बाजारातून सुटे तेल आणि माल खरेदी करुन तो माध्यमांसमोर दाखवल्याचा गंभीर आरोप पाडवी यांनी फडणवीसांवर केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिवासी विकास विभागाकडून चांगलं काम होत असल्यामुळे आदिवासी खातं आणि आपल्याला बदनाम करण्याचा हा कट असल्याचंही पाडवी यांनी म्हटलंय. भाजपच्या काळात या विभागात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आपण तोंड उघडल्यास भाजपला महाग पडेल, असा इशाराही पाडवी यांनी फडणवीसांनी दिला आहे.

फडणवीस यांचा आरोप काय?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी विधानसभेत जोरदार राडा झाला होता. त्यावेळी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. याचा निषेध म्हणून भाजपनं विधानसभेच्या बाहेरच प्रति विधानसभा भरवली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यावेळी फडणवीस यांनी आदिवासी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या खावटी अनुदान योजनेतील घोटाळ्यावर बोट ठेवलं होतं. या योजनेतून आदिवसांना देण्यात येणाऱ्या वस्तू अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी काही वस्तूही दाखवल्या होत्या.

इतर बातम्या :

संजय राठोड मंत्रिपदासाठी ‘प्रचंड आशावादी’, अजूनही म्हणतात, ‘मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील!’

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रिय ठरले, त्यांना पंतप्रधान करा’, पृथ्वीराज चव्हाण यांना राहुल गांधींचा विसर?

Tribal Development Minister K. C. Padvi’s reply to Devendra Fadnavis

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...