AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

25 वर्ष समाजकारणात घालवली, आता पुढचा प्लॅन ठरला : उदयनराजे

25 वर्ष समाजकारणात घालवली, आता गप्प बसणार, असं लोकसभा पोटनिवडणुकीतील निकालावर उदयनराजेंनी म्हटलं. तसेच, आपण हरल्यास पुढील 5 वर्षे साताऱ्याचा विकास थांबेल, असंही त्यांनी सांगितलं.

25 वर्ष समाजकारणात घालवली, आता पुढचा प्लॅन ठरला : उदयनराजे
| Updated on: Oct 24, 2019 | 8:55 PM
Share

सातारा : राज्यात आज (24 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले (Maharashtra Assembly Election Result). त्यासोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचीही (Satara Loksabha Bypoll Result) मतमोजणी झाली. मात्र, या निवडणुकीत साताऱ्याच्या जनतेने छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात कल दिला आहे. पाच महिन्यांपूर्वी मोठ्या मताधिक्क्याने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उदयराजेंना पोटनिवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. त्यामुळे उदयनराजेंना मोठा धक्का बसला.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून उदयनराजे पिछाडीवर होते. उदयनराजे सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्येच 30 हजार मतांनी पिछाडीवर होते. राजेंच्या पराभवामुळे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

25 वर्ष समाजकारणात घालवली, आता गप्प बसणार, असं लोकसभा पोटनिवडणुकीतील निकालावर भाजपचे नेते आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजेंनी म्हटलं. तसेच, आपण हरल्यास पुढील 5 वर्षे साताऱ्याचा विकास थांबेल, असंही त्यांनी सांगितलं (Udayanraje Bhosale defeat). एक पाऊल मागे जाणं हे मोठी झेप घेण्यासाठी असतं. लोकांनी विचार करुन मतदान केलं. प्रचारात मी काय केलं हे स्पष्टपणे सांगितले आहे. मी जर निवडून आलो नाही, तर पुढील 5 वर्षे विकास थांबेल, असं उदयनराजे म्हणाले.

राजेंनी जनतेचा कौल मान्य केला आहे. मात्र, हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलं. ‘नागरिक हे लोकशाहीतले राजे आहेत, त्यांनी जो कौल दिला, तो इतर लोक कधीच स्वीकारु शकत नाहीत, मात्र मी तो स्विकारतो. आजपर्यंत ज्यांना केंद्रबिंदू मानून (शरद पवार) काम केलं, त्यांनी सांगितली तिच पूर्वदिशा मानली. मी चुकीचा निर्णय घेतला असेल, तर जास्तीत जास्त काय होणार, मी पराभूत होईल आणि ते मला मान्य आहे. पण माझं वैयक्तिक जीवनही आहे, 20-25 वर्ष मी समाजकारणात घालवली, निस्वार्थीपणे लोकांसाठी काम केलं. मात्र, याच्यापुढे गप्प बसणार, आणखी काय करु करतो’, अशी खंत यावेळी उदयराजे यांनी व्यक्त केली. यावेळी ते भावूक झाले होते.

गेल्या मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली होती. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र, यंदा त्यांची आघाडी निम्म्याने घटली. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंनी 1,26,528 मतांनी विजय मिळवला होता.

साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचीही (Satara Loksabha Bypoll Result) घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली होती.

पाहा व्हिडीओ :

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.