AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ दिवशी भाजप अर्धा फुटलेला असेल; उद्धव ठाकरे यांनी तारीखच सांगितली

"हे दगाबाज आहेत. घरात घुसले तर आग लावून पळतात बाहेर. आमचं सोडा. आमच्या ताकदीने आम्ही आहोत. मोदी आणि भाजपसमोर कोणता प्रश्न असेल की भाजपचं काय होईल?", असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

'त्या' दिवशी भाजप अर्धा फुटलेला असेल; उद्धव ठाकरे यांनी तारीखच सांगितली
उद्धव ठाकरे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 16, 2024 | 7:13 PM
Share

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते आपल्यासोबत येतील, असा दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षाच्या फुटीबाबतची भविष्यवाणी वर्तवली आहे. विशेष म्हणजे यासाठी उद्धव ठाकरेंनी तारीख देखील सांगून टाकली आहे. त्यामुळे आगामी काळातल्या राजकीय घडामोडी या अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भवितव्याबद्दल मोठं भाकीत वर्तवलं.

“मला चिंता आहे की, ४ जूनला सरकार जातंय. त्या दिवशी अर्धा भाजप तिथेच फुटेल. परत पंतप्रधानपद गेलेलं असेल. त्यांनी ७५ वर्षाची अट टाकलेली आहे. दोन वर्षांनी मोदी रिटायर होणार. मग भाजपचं काय होईल? एक जमाना असा होता, की अटलबिहारींचा पराभव झाला होता. दोनच खासदार भाजपचे होते. पुन्हा ३०२ वरून दोन झाले तर काय करतील भाजपवाले? यांना कुठे विलीन व्हायला पक्षही राहणार नाही. यांना कोणीही घेणार नाही, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

“हे दगाबाज आहेत. घरात घुसले तर आग लावून पळतात बाहेर. आमचं सोडा. आमच्या ताकदीने आम्ही आहोत. मोदी आणि भाजपसमोर कोणता प्रश्न असेल की भाजपचं काय होईल. कारण मोदींचा चेहराही राहिला नाही. सत्ता गेल्यावर त्यांच्याकडे आलेले उंदीर कोणत्या दारात जाणार? कारण आता दारंही राहिली नाहीत. पुन्हा हे गद्दार पक्ष काढणार का?”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

‘गंगेच्या साफ सफाईचं काय झालं?’

“परवा मोदींनी अर्ज भरला. त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली. २०१४ मध्ये गंगा माँ ने बुलाया था. आता गंगा माँने मला दत्तक घेतलं असं मोदी म्हणाले. त्या गंगेत कोरोनाच्या काळात प्रेते तरंगली. तेव्हा गंगेचे अश्रू का पुसले नाहीत? का तिचे अश्रू पाहिले नाही? काही तरी बोलत आहे. गंगेच्या साफ सफाईचं काय झालं? काहीतरी बोलत आहेत. का तुम्हाला दत्तक घेतलं जात आहे?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मला कठपुतळ्यांबद्दल बोलायचं नाही’, ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात

“मिंधे हा या निवडणुकीत विषय होऊ शकत नाही. त्यांची योग्यता नाही. ते फक्त कठपुतली आहेत. आम्ही भाजपसोबतच होतो. २५ ते ३० वर्ष भाजपसोबत होतोच ना. कसे वागले ते? तुम्ही अडीच वर्ष भोगलंत ना सगळं? म्हणून मला कठपुतळ्यांबद्दल बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली