AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्त्रीशक्तींच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांचे मोहन भागवत यांना दोन सवाल; म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना दोन सवाल विचारत थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या हिंदुत्वावर बोट ठेवत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना देखील टोला लगावला आहे.

स्त्रीशक्तींच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांचे मोहन भागवत यांना दोन सवाल; म्हणाले...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 05, 2022 | 8:50 PM
Share

मुंबई : मोहन भागवत (Mohan Bhagvat) मशिदीत गेले होते. कशासाठी गेले होते. त्यांनी हिंदुत्व (Hindutva) सोडलं का? भागवत तिकडे गेले. त्यांचा संवाद सुरू आहे. त्यांचं राष्ट्रीय कार्य आहे. आम्ही काँग्रेससोबत (Congress) गेलो तर हिंदुत्व सोडलं? कुठला संबंध कुठे लावता. मोहन भागवत यांनी महिला शक्तींबद्दल बोलले. मला तुम्हाला दोन प्रश्न करायचे आहे. अंकिता भंडारी या उत्तराखंडच्या मुलीची हत्या झाली. रिसॉर्टमध्ये मृतदेह आढळला. ते रिसॉर्ट भाजपच्या नेत्याचं आहे. ही स्त्रीशक्तीचा आदर आहे का? त्या अंकिताची आई टाहो फोडतेय. काय कारवाई केली? शिक्षा देणार आहात का? फासावर चढवणार आहात का ? अंकिता भंडारे ही महिला आहे. तुम्ही मशिदीत जाऊन आला. म्हणून बोलतो. नाही तर बोललो नसतो, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारला आहे.

तर दूसरा सवाल बिल्किस बानू या प्रकरणावरून विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले दुसरी बातमी वाचली. बिल्किस बानू. ती गर्भवती होती. तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या नातेवाईकांना मारलं. आरोपी पकडले.

पण भाजप सरकारने त्यांना सोडलं. आरोपींचा सत्कार केला. तुमच्या पक्षात या गोष्टी घडत असेल. तुमच्या अनुयायांकडून या गोष्टी घडत असतील तर कुणाकडून अपेक्षा करायची?

असे सवाल उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना विचारत ठाकरे यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या हिंदुत्वावर बोट ठेवत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना देखील टोला लगावला आहे.

शिवाजी पार्क येथे झालेल्या दसऱ्या मेळाव्यात बोलत असतांना उद्धव ठाकरेंनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना सवाल विचारले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.