AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय शिवतारे आक्रमक, अजितदादा बॅकफूटवर?; म्हणाले, शेवटी…

खासदार अमोल कोल्हे राजीनामा द्यायला निघाले होते. मला मालिका करायला वेळ मिळत नाही, माझ्यातल्या अभिनेत्याला वेळ मिळत नाही, मी सलेब्रिटी आहे, मला कसा पक्षाला एवढा वेळ देता येईल? असं ते म्हणायचे. तुम्ही बघा, गेल्या पाच वर्षात त्यांनी खरंच मतदारसंघाला वेळ दिला नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली.

विजय शिवतारे आक्रमक, अजितदादा बॅकफूटवर?; म्हणाले, शेवटी...
vijay shivtare and ajit pawar
| Updated on: Mar 20, 2024 | 9:42 PM
Share

पुणे | 20 मार्च 2024 : बारामती मतदारसंघाच्या उमेदवारीवरून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना दोनदा समजावून सांगितले तरी शिवतारे हे काही बारामतीतून माघार घ्यायला तयार नाहीत. अजितदादांनी माझी औकात काढली होती. आता बारामतीची जनता माझ्या पाठी आहे. जनता जो निर्णय घेईल तेच मी करेल, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. शिवतारे यांनी मैदानात दंड थोपटून उभं राहण्याचं ठरवल्याने नेहमी आक्रमक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार बॅकफूटवर गेले आहेत. अजित पवार यांनी शिवतारे यांच्या भूमिकेवर अत्यंत सावध भूमिका घेतली आहे.

अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे उभ्या आहेत. त्यामुळे पवार घरातच काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. त्यातच विजय शिवतारे यांनी बारामतीच्या रणसंग्रामात उडी घेतल्याने सुनेत्रा पवार यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अजितदादा बॅकफूटवर आले आहेत. त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

मनात आलं, दिली प्रतिक्रिया

अजितदादा खडकवासल्यात महायुतीच्या बैठकीला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विजय शिवतारे यांचे नेते आहेत. त्यामुळे शेवटी आपल्या नेत्याचं ऐकायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं सांगतानाच शिवतारे यांच्या मनात आलं त्यांनी टीका केली. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, अशी सावध प्रतिक्रिया अजितदादांनी दिली आहे.

आम्हीही आरेला…

शिवतारे यांचा फटका बसेल याबाबत मला आता सांगता येणार नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंना आवाहन केलंय. आता शिवतारेंनी नेतृत्वाचे ऐकायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र आम्हाला वातावरण खराब करायचे नाही. आम्हीही आरेला कारे करू शकतो. मात्र वातावरण खराब न करता निवडणूकीला सामोरे जायचे आहे, अशा शब्दात अजितदादांनी शिवतारे यांना सुनावले.

पार्थ गनिमी काव्याने…

पार्थ पवार हे बारामतीच्या प्रचारात दिसत नाहीत. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर अजितदादांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. पार्थ पवार हे गुप्त पद्धतीने प्रचार करत आहेत. गनिमी काव्याने प्रचार करत आहेत, असं मिश्किल उत्तर अजितदादांनी दिलं.

दिल्ली म्हणजे पाकिस्तान नाही

अजित पवार यांना पूर्वी राष्ट्रवादीत स्वत: निर्णय घेण्याचे अधिकार होते. आता त्यांना दिल्लीवारी करावी लागते, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली होती. कोल्हे यांच्या या टीकेवर अजितदादांनी पलटवार केला आहे. दिल्ली म्हणजे काय पाकिस्तान नाही ना? यांना दिल्लीवारी करावी लागत नाही काय?, असा सवाल अजितदादांनी केला. यावेळी अजितदादांनी अमोल कोल्हे यांना राजीनाम्याची आठवणही करून दिली. मीच कोल्हेंना पक्षात आणलं आणि निवडूनही आणलं. ठिक आहे, दिवस बोलतात, असं म्हणत अजितदादांनी सूचक इशाराही दिला.

त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! तटकरेंचा वडेट्टीवारांना टोला
त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! तटकरेंचा वडेट्टीवारांना टोला.
मुंबई महानगरपालिकेच्या 18 प्रभाग समितीपैकी 8 प्रभाग समिती ठाकरेंकडे?
मुंबई महानगरपालिकेच्या 18 प्रभाग समितीपैकी 8 प्रभाग समिती ठाकरेंकडे?.
अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी
अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी.
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप.
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला...
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला....
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या.
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं.
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.