AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूपीए अध्यक्षाच्या भूमिकेत शरद पवार? ममतांचा फोन आणि बंगालची लढाई

ममतांनी मदतीसाठी शरद पवारांना साद घातली आहे.पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत, गरज वाटल्यास बंगालकडे कूच करण्याचं जाहीर केलं.

यूपीए अध्यक्षाच्या भूमिकेत शरद पवार? ममतांचा फोन आणि बंगालची लढाई
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Dec 22, 2020 | 12:09 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होतील (Why Sharad Pawars name in UPA chairmanship) अशी चर्चा 8-10 दिवसापूर्वी सुरु होती. ही चर्चा शरद पवारांच्या स्पष्टीकरणाने थांबली. UPA चं प्रमुखपद मी स्वीकारणार असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत, असं पवार म्हणाले होते. मात्र सध्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागलं आहे. भाजपने आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला असताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सुरुंग लावण्याचा चंग भाजपने बांधला आहे. (Why Sharad Pawars name in UPA chairmanship)

अशा परिस्थितीत ममतांनी मदतीसाठी शरद पवारांना साद घातली आहे. शरद पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत, आवश्यकता वाटल्यास पश्चिम बंगालकडे कूच करण्याचं जाहीर केलं.

या सर्व पार्श्वभूमीमुळे पुन्हा एकदा संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचं अध्यक्षपद चर्चेत आलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या 2004 पासून ते आजपर्यंत यूपीएच्या अध्यक्ष आहेत. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद आधीच सोडलं आहे. त्यानंतर आता यूपीएच्या अध्यक्षपदासाठीही चाचपणी सुरु आहे. अशा परिस्थितीत छोट्या-मोठ्या पक्षांची मिळून बनलेली आघाडी अर्थात यूपीएचं नेतृत्त्व कोण करु शकतो, असा प्रश्न विचारला जात आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर बहुतेकांनी शरद पवार असं दिलं आहे.

असं असलं तरी शरद पवारांनी तूर्तास तरी आपण यूपीएचं प्रमुखपद स्वीकारण्याबाबतच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती आणि शरद पवारांचा सर्वपक्षीय संबंध, त्यांचा अनुभव पाहता, यूपीएच्या अध्यक्षपदाच्या निवडीत शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.

मलिकांच्या दाव्याने बळ

नुकतंच नवाब मलिक यांनी शरद पवार हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी पश्चिम बंगालला जाणार असल्याचं म्हटलं. “भाजप केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या अधिकाराचे हनन करुन पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा विषय राज्यसरकारचा असताना केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम आहे. हा विषय गंभीर असून याविषयासंदर्भात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि पवारसाहेब यांची चर्चा झाली असून, गरज पडल्यास पश्चिम बंगालमध्ये पवारसाहेब जातील” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

अध्यक्षपदाच्या निवडीत पवारांची भूमिका महत्त्वाची का?

ममतांनी शरद पवारांना मदतीसाठी साद घालणं, यावरुन शरद पवारांचे मित्रपक्षाशी असलेले संबंध आणि त्यांचं राजकीय कसब लक्षात येतं. यावरुनच अध्यक्षपदाच्या निवडीत पवारांची भूमिका महत्त्वाची का आहे, हे दिसून येतं.

राजकीय विश्लेषकांच्या मते, “शरद पवार हे देशातील महत्वाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. यूपीएतील घटक पक्षांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. केवळ सलोख्याचे संबंधच नव्हे तर त्यांच्या शब्दाला मान आहे. अनुभवातून आलेलं मार्गदर्शन हे यूपीएची मोट बांधण्यासाठी आवश्यक आहे”.

महाराष्ट्रातील राजकारणाचा दाखला

शरद पवारांनी भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना केली. सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजप महाराष्ट्रात सत्तेपासून दूर राहिला. अशक्य असणारी गोष्ट शरद पवारांनी शक्य करुन दाखवली. शरद पवारांनी टोकाचा आणि भिन्न विचार असलेल्या शिवसेनेशी जुळवून घेतलं. कधीही जवळ न येणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणलं आणि महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं.

यूपीएच्या पुनर्बांधणीत पवारांची भूमिका

शरद पवारांचं हेच कसब राष्ट्रीय राजकारणात आवश्यक असल्याचं मत, यूपीएतील घटक पक्ष बोलून दाखवत आहेत. सध्या मोदी-शाहांचा विजयी वारु रोखण्यासाठई यूपीएची पुनर्बांधणी आवश्यक आहे. घटक पक्षातील क्षमता आणि मर्यादा ओळखून भाजपला कसं रोखायचं याचं नियोजन पवारच करु शकतात, असा विश्वास यूपीएतील पक्षांना आहे.

यूपीएची निर्मिती

यूपीएच्या घटक पक्षांमध्ये देशभरातील अनेक राजकीय पक्षांचा समावेश आहे. प्रामुख्याने काँग्रेसच्या नेतृत्त्वात मित्रपक्षांची मिळून संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA ची निर्मिती झाली. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यावेळी भाजपप्रणित NDA ला रोखण्यासाठी UPA ची मोट आणखी मजबूत करण्यात आली.  यूपीएने 2004 आणि 2009 मध्ये देशात सत्ता स्थापन केली. UPA 1 आणि UPA 2 च्या सत्ताकाळात मनमोहन सिंह यांनी पंतप्रधानपद भूषवलं.

यूपीएमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रातील प्रमुख दोन पक्ष आहेत. दक्षिणेकडील पक्ष ही यूपीएची ताकद आहे. तामिळनाडूतील द्रमुक, अण्णा द्रमुक, बिहारमधील राजद, केरळ आणि तामिळनाडूतील भारतीय मुस्लिम लीग, जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स, झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा, केरळमधील क्रांतिकारी समाजवादी पार्टी, आसाममधील डेमोक्रॅटिक फ्रंट, उत्तर प्रदेशातील सपा-बसपा, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस असे अनेक पक्ष यूपीएमध्ये आहेत. काहींनी UPA ची साथ सोडली तर काही अद्याप यूपीएसोबत आहेत.

पवारांचे कुणाकुणाशी सलोख्याचे संबंध?

शरद पवारांचे यूपीएतील बहुतेक सर्व पक्षाशी सलोख्याचे संबंध आहेत.  ममता बॅनर्जी संकटसमयी पवारांना कॉल करतात, त्यावरुन त्यांच्या सलोख्याची कल्पना येऊ शकते. याशिवाय समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव, RJD चे लालू यादव, जम्मू काश्मीरमधील अब्दुल्ला पिता-पुत्र, अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, NDA तून बाहेर पडलेले प्रकाशसिंह बादल अशा दिग्गजांशी पवारांचे सलोख्याचे संबंध आहेत. महत्त्वाचे म्हणजे हेच यूपीएमधील महत्त्वाचे चेहरे आहेत. त्यामुळे UPA अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत पवारांची भूमिका महत्त्वाची आहे.

(Why Sharad Pawars name in UPA chairmanship)

संबंधित बातम्या 

पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राच्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पाठिंबा! 

राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र? शरद पवारांचं नाव त्याचा भाग? वाचा सविस्तर

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ