AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : धारावीची जमीन घेता, कुलाब्याची जमीन का घेत नाही? कारण तिथे…राहुल गांधींचा सवाल

Rahul Gandhi : "भाजपचे लोक, मोदी, शाह धारावीची जमीन महाराष्ट्रातील गरीबांची जमीन एक लाख कोटीची जमीन आपले मित्र गौतम अदानीला द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राच सरकार तुमच्या हातून चोरलं. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. डोळयादेखत कोट्यवधी रुपये देऊन तुमचं सरकार तुमच्यापासून हिरावून घेतलं" असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi : धारावीची जमीन घेता, कुलाब्याची जमीन का घेत नाही? कारण तिथे...राहुल गांधींचा सवाल
नरेंद्र मोदी, राहुल गांधीImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 16, 2024 | 1:31 PM
Share

“धारावीची जमीन घेता. कुलाब्याची जमीन का घेत नाही? कारण तिथे श्रीमंत आहेत. दलित, आदिवासी , ओबीसी नाहीत. दलित, ओबीसी आणि आदिवासी जिथे आहेत, तिथे जमीन हडप केली जाते. मी जमीन अधिग्रहणावर भाष्य केलं तेव्हापासून अदानी, अंबानीचे लोक माझ्या मागे लागले. माझी प्रतिमा बदनाम केली जात आहे. धारावीची जमीन जात असेल हजोरो कोटी अब्जाधीशांच्या घशात जात असतील, तर हजारो कोटी रुपये गरिबांना मिळाले पाहिजेत” असं राहुल गांधी म्हणाले. “तुमची जमीन त्यांना पाहिजे, त्यांना तुमचं जल पाहिजे, जंगल पाहिजे. ते तुमच्याकडून सर्व घेऊ पाहत आहेत. 25 अब्जाधीश आहेत. त्यांचे 16 लाख कोटी रुपये या सरकारने माफ केले आहेत. आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. एक लाख कोटी रुपये अदानीला धारावीत दिले जाणार आहेत. त्यांना वाटतं सहज होईल. पण ते सहज शक्य होणार नाही. राहुल गांधी इथे उभा आहे” असं आव्हान राहुल गांधी यांनी दिला.

“अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले पाहिजे, असं संविधानात कुठे लिहिलं आहे. संविधान हे शिवाजी महाराजांचं आहे. शिवाजी महाराजांनी प्राण सोडला असता, पण गरीबांच्या जमिनी जाऊ दिल्या नसत्या. शिवाजी महाराजांनी प्राण सोडले असते पण धारावीची जमीन जाऊ देऊ दिली नसती. शिवाजी महाराजांनी जमिनींचं रक्षण केलं असतं” असं राहुल गांधी म्हणाले.

‘प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 3 हजार रुपये येतील’

“आमचं सरकार आलं तर डिसेंबरमध्ये तुम्ही जेव्हा झोपेतून उठाल. तेव्हा बँकेत जाऊन खातं चेक कराल. तेव्हा तुमच्या लक्षात येईल इंडिया आघाडीने तुमच्या खात्यात महिन्याचे 3 हजार रुपये टाकले आहेत. तुम्ही मुलांना सांगाल, 3 हजार रुपये आमच्या खात्यात आले. तुमची मुलं सांगतील प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 3 हजार रुपये येतील. आमचे सरकार प्रत्येक महिन्याला पैसे टाकणार. जसे मोदी अब्जाधीश अदानीच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकतात. तसेच आम्ही महिलांच्या खात्यात पैसे टाकणार आहोत” असं राहुल गांधी म्हणाले.

‘सरकार चोरलं पाहिज हे काय संविधानात लिहिलं काय?’

“सरकार चोरलं पाहिज हे काय संविधानात लिहिलं काय? हे सरकार धारावीसाठी चोरण्यात आलं होतं. भाजपचे लोक, मोदी, शाह धारावीची जमीन महाराष्ट्रातील गरीबांची जमीन एक लाख कोटीची जमीन आपले मित्र गौतम अदानीला द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राच सरकार तुमच्या हातून चोरलं. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. डोळयादेखत कोट्यवधी रुपये देऊन तुमचं सरकार तुमच्यापासून हिरावून घेतलं. चोरी केलं. मोदी आणि शाह यांनी संपूर्ण देशाला माहीत आहे, या दोघांनी हे काम केलं आहे” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?