AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : धारावीची जमीन घेता, कुलाब्याची जमीन का घेत नाही? कारण तिथे…राहुल गांधींचा सवाल

Rahul Gandhi : "भाजपचे लोक, मोदी, शाह धारावीची जमीन महाराष्ट्रातील गरीबांची जमीन एक लाख कोटीची जमीन आपले मित्र गौतम अदानीला द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राच सरकार तुमच्या हातून चोरलं. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. डोळयादेखत कोट्यवधी रुपये देऊन तुमचं सरकार तुमच्यापासून हिरावून घेतलं" असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi : धारावीची जमीन घेता, कुलाब्याची जमीन का घेत नाही? कारण तिथे...राहुल गांधींचा सवाल
नरेंद्र मोदी, राहुल गांधीImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 16, 2024 | 1:31 PM
Share

“धारावीची जमीन घेता. कुलाब्याची जमीन का घेत नाही? कारण तिथे श्रीमंत आहेत. दलित, आदिवासी , ओबीसी नाहीत. दलित, ओबीसी आणि आदिवासी जिथे आहेत, तिथे जमीन हडप केली जाते. मी जमीन अधिग्रहणावर भाष्य केलं तेव्हापासून अदानी, अंबानीचे लोक माझ्या मागे लागले. माझी प्रतिमा बदनाम केली जात आहे. धारावीची जमीन जात असेल हजोरो कोटी अब्जाधीशांच्या घशात जात असतील, तर हजारो कोटी रुपये गरिबांना मिळाले पाहिजेत” असं राहुल गांधी म्हणाले. “तुमची जमीन त्यांना पाहिजे, त्यांना तुमचं जल पाहिजे, जंगल पाहिजे. ते तुमच्याकडून सर्व घेऊ पाहत आहेत. 25 अब्जाधीश आहेत. त्यांचे 16 लाख कोटी रुपये या सरकारने माफ केले आहेत. आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. एक लाख कोटी रुपये अदानीला धारावीत दिले जाणार आहेत. त्यांना वाटतं सहज होईल. पण ते सहज शक्य होणार नाही. राहुल गांधी इथे उभा आहे” असं आव्हान राहुल गांधी यांनी दिला.

“अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले पाहिजे, असं संविधानात कुठे लिहिलं आहे. संविधान हे शिवाजी महाराजांचं आहे. शिवाजी महाराजांनी प्राण सोडला असता, पण गरीबांच्या जमिनी जाऊ दिल्या नसत्या. शिवाजी महाराजांनी प्राण सोडले असते पण धारावीची जमीन जाऊ देऊ दिली नसती. शिवाजी महाराजांनी जमिनींचं रक्षण केलं असतं” असं राहुल गांधी म्हणाले.

‘प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 3 हजार रुपये येतील’

“आमचं सरकार आलं तर डिसेंबरमध्ये तुम्ही जेव्हा झोपेतून उठाल. तेव्हा बँकेत जाऊन खातं चेक कराल. तेव्हा तुमच्या लक्षात येईल इंडिया आघाडीने तुमच्या खात्यात महिन्याचे 3 हजार रुपये टाकले आहेत. तुम्ही मुलांना सांगाल, 3 हजार रुपये आमच्या खात्यात आले. तुमची मुलं सांगतील प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 3 हजार रुपये येतील. आमचे सरकार प्रत्येक महिन्याला पैसे टाकणार. जसे मोदी अब्जाधीश अदानीच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकतात. तसेच आम्ही महिलांच्या खात्यात पैसे टाकणार आहोत” असं राहुल गांधी म्हणाले.

‘सरकार चोरलं पाहिज हे काय संविधानात लिहिलं काय?’

“सरकार चोरलं पाहिज हे काय संविधानात लिहिलं काय? हे सरकार धारावीसाठी चोरण्यात आलं होतं. भाजपचे लोक, मोदी, शाह धारावीची जमीन महाराष्ट्रातील गरीबांची जमीन एक लाख कोटीची जमीन आपले मित्र गौतम अदानीला द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राच सरकार तुमच्या हातून चोरलं. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. डोळयादेखत कोट्यवधी रुपये देऊन तुमचं सरकार तुमच्यापासून हिरावून घेतलं. चोरी केलं. मोदी आणि शाह यांनी संपूर्ण देशाला माहीत आहे, या दोघांनी हे काम केलं आहे” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

Follow Us
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल.
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद.
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स....
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स.....
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी.
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.