AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction : ना महापूर, ना भूकंप, ना युद्ध जगावर येणार दुसरंच मोठं महासंकट; बाबा वेंगा यांचं थरकाप उडवणार भाकीत

बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकीत खरी ठरली आहेत, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. बाबा वेंगा यांचं आता आणखी एक मोठं भाकीत समोर आलं आहे.

Baba Vanga Prediction : ना महापूर, ना भूकंप, ना युद्ध जगावर येणार दुसरंच मोठं महासंकट; बाबा वेंगा यांचं थरकाप उडवणार भाकीत
| Updated on: Apr 06, 2025 | 6:23 PM
Share

प्रत्येकाला आपलं भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. आपलं भविष्य कसं असणार? भविष्यात आपल्यासोबत कोणत्या घटना घडणार आहेत? आपल्यासोबत काय होऊ शकतं हे जाणून घेण्यासाठी आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो. तो आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल भविष्यवाणी करत असतो. दरम्यान जेव्हा-जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांचा विषय निघतो, त्यामध्ये आवर्जून एका नावाची चर्चा होते, ती म्हणजे बाबा वेंगा यांच्या नावाची. बाबा वेंगा यांचा जन्म बग्लेरीयामध्ये झाला. असं मानलं जातं की एका वादळात सापडल्यामुळे बाबा वेंगा यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली होती. त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यानंतर बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकीतं खरी ठरली आहेत, असा दावा केला जातो.

बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकीत खरी ठरली आहेत, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. बाबा वेंगा यांनी अमेरिकेवर होणाऱ्या हल्ल्याबाबत आधीच भाकीत केलं होतं. ते खरं ठरलं असं मानलं जातं. हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या रानीचा मृत्यू अशा अनेक गोष्टींबाबत बाबा वेंगा यांनी आधीच भविष्यवाणी केली होती. दरम्यान बाब वेंगा यांनी 2025 बाबात देखील काही भाकीतं केली आहेत. ती आता खरी ठरत असल्याचा दावा केला जात आहे. 2025 मध्ये जगाच्या अंताला सुरुवात होईल, अनेक देशांमध्ये शक्तिशाली महाभूकंप होतील, महापूर येतील, आजार पसरतील, भीषण युद्ध देखील होऊ शकतं असं भाकीत 2025 संदर्भात बाबा वेंगा यांनी वर्तवलं होतं.

मात्र आता त्यांचं आणखी एक नवं भाकीत समोर आलं आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. बाबा वेंगा यांनी हे भाकीत सायबर क्राइम संदर्भात केलं आहे. तेव्हा एआय तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हतं. मात्र या संदर्भात एक मिळतं -जुळतं भाकीत तेव्हा बाबा वेंगा यांनी केलं आहे. पुढील काळात एक असं तंत्रज्ञान विकसीत होईल, त्यामुळे मानवाचे सर्वच कामे सोपे होतील, मात्र हे तत्रंज्ञान मानवासाठी खूप घातक देखील ठरणार आहे. सायबर क्राइमचा धोका इतका वाढेल की हे संकट जगात धुमाकूळ घालेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. त्यांनी हे भाकीत इटरनेट संदर्भात केलं असावं असा अंदाज वर्तवला जात आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.