AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahu Ketu Gochar: राहू केतू गोचरमुळे या चार राशींवर होणार परिणाम, लगेच व्हा सावध!

या वर्षाच्या अखेरीस 30 ऑक्टोबर रोजी दोघेही मीन राशीत प्रवेश करतील. दोन्ही ग्रहांच्या राशी बदलामुळे 4 राशीच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो.

Rahu Ketu Gochar: राहू केतू गोचरमुळे या चार राशींवर होणार परिणाम, लगेच व्हा सावध!
राहू केतूImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 19, 2023 | 7:39 PM
Share

मुंबई,  राहु आणि केतू  (Rahu Ketu Gochar) हे दोन्ही ग्रह जेव्हा जेव्हा आपल्या राशीत प्रवेश करतात किंवा त्यांची राशी बदलतात तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. हे दोन्ही ग्रह यावर्षी आपल्या राशी बदलणार आहेत. राहू-केतू हे छाया ग्रह मानले जातात आणि नेहमी उलटे फिरतात. जोतिष्यशास्त्रात यो दोन्ही ग्रहांना अशुभ ग्रह मानले आहे. त्यांच्या प्रभावामुळे जातकांच्या जीवनात समस्या वाढतात आणि त्यांला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते. राहू-केतूच्या प्रतिगामी हालचालीमुळे त्यांच्या संक्रमणास दीड वर्षाचा कालावधी लागतो. या वर्षाच्या अखेरीस 30 ऑक्टोबर रोजी दोघेही मीन राशीत प्रवेश करतील. दोन्ही ग्रहांच्या राशी बदलामुळे 4 राशीच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो.

या चार राशींवर होणार प्रभाव

मीन-

दोन्ही छाया ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत आगमन झाल्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक पाऊल सावधपणे उचलावे लागेल. या लोकांनी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे टाळावे. त्यांना कर्ज फेडण्यात अडचणी येऊ शकतात. व्यवसायातही अशुभ बातमी मिळू शकते.

मेष-

राहू-केतूचे संक्रमण, मेष राशीच्या लोकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. या राशीच्या लोकांचा खर्च वाढेल. खर्च वाढल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढेल. याशिवाय वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होईल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.

वृषभ-

राहू-केतूच्या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक टप्यावर अडचणी येऊ शकतात. या लोकांची उधळपट्टी वाढेल. यासोबतच घराचे बजेटही बिघडते. यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.