AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंडलीत राहु-केतू दोष आहे, मग हा उपाय करा, सुख शांती लाभेल

कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीतील (Kundali) ग्रहाच्या राशीतील बदलाचा त्यांच्या जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. राहू-केतू (Rahu ketu) ज्यांना छाया ग्रह देखील म्हणतात, यांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.

कुंडलीत राहु-केतू दोष आहे, मग हा उपाय करा, सुख शांती लाभेल
rahu
| Updated on: Apr 25, 2022 | 10:45 AM
Share

मुंबई : व्यक्तीच्या कुंडलीतील (Kundali) ग्रहाच्या राशीतील बदलाचा त्यांच्या जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. राहू-केतू (Rahu ketu) ज्यांना छाया ग्रह देखील म्हणतात, यांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. या उपाययोजना वेळीच केल्या नाहीत तर व्यक्ती मोठ्या संकटातही अडकू शकते. राहू-केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यापैकी एक म्हणजे कान टोचणे. कान टोचण्याला 16 संस्कारांमध्ये स्थान दिले आहे. कान टोचण्याचेही ज्योतिषशास्त्रीय (Jyotish)महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रात कान टोचण्याचे तर्क सुद्धा क्रोधीत राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी सांगितले आहेत.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू चुकीच्या स्थितीत असतील तर व्यक्तीला कान टोचण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने राहू आणि केतूचे वाईट प्रभाव हळूहळू संपतात. एवढेच नाही तर असे केल्याने वाईट शक्तींचा नाश होतो आणि व्यक्तीला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळते. मन तीक्ष्ण होते आणि निर्णय घेण्याची क्षमताही वाढते. अशी मान्यता आहे.

त्याच प्रमाणे आपल्या घरातील पूजाअर्चेत आपण रोजच कापूर वापरतो. कापूराचा उपयोग हवन आणि आरतीसाठीही केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही कापूरने अनेक प्रकारचे उपाय देखील करू शकता. या उपायांमुळे ग्रह दोष आणि वास्तु दोष दूर होण्यास मदत होते. हिंदू धर्मात कोणतीही पूजा किंवा विधी कापूरशिवाय पूर्ण मानले जात नाही. पूजेशिवाय अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठीही कापूर उपयुक्त आहे. याच्या नियमित वापराने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. राहू केतूचा परिणाम कमी होतो. त्याचे महत्त्व आणि उपयोग वास्तु आणि ज्योतिषशास्त्रातही सांगितले आहे.

कान टोचल्याने राहू-केतूचा प्रभाव दूर होतो ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत राहू-केतूची अशुभ स्थिती किंवा या ग्रहांच्या चुकीच्या जागी बसल्याने जीवनावर वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत व्यक्तीचे कान टोचण्याचा सल्ला ज्योतिष शास्त्रात देण्यात आला आहे. यामुळे व्यक्तीवरील राहू-केतूचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | लग्नासाठी मुली बघताय ? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा

‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपाय… सर्व त्रास होतील दूर !

24-30 April 2022, साप्ताहिक राशिभविष्य : कन्या राशीसाठी कठीण असेल काळ, पहा इतर राशींसाठी संपूर्ण आठवडा कसा राहील..

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.