AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ‘या’ पाच गोष्टी घडतायत, तर समजा तुमच्या घरावर आर्थिक संकट ओढावणार

आचार्य चाणक्य यांना राजकारण आणि अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते. आचार्य सर्व विषयांचे जाणकार होते. आचार्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि त्यांच्या समजुतीचे सर्व पुरावे तुम्हाला इतिहासाच्या पानांवर सापडतील. आचार्यांच्या कुशल धोरणाचा आणि समजुतीचा परिणामच होता की त्यांनी नंद राजवंश पूर्णपणे संपवल्यानंतर एका सामान्य मुलाला सिंहासनावर बसवले.

Chanakya Niti : 'या' पाच गोष्टी घडतायत, तर समजा तुमच्या घरावर आर्थिक संकट ओढावणार
विद्यार्थी जीवनात जो 'या' सवयी सोडतो त्याच्यासाठी काहीही नाही अशक्य
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 7:28 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांना राजकारण आणि अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते. आचार्य सर्व विषयांचे जाणकार होते. आचार्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि त्यांच्या समजुतीचे सर्व पुरावे तुम्हाला इतिहासाच्या पानांवर सापडतील. आचार्यांच्या कुशल धोरणाचा आणि समजुतीचा परिणामच होता की त्यांनी नंद राजवंश पूर्णपणे संपवल्यानंतर एका सामान्य मुलाला सिंहासनावर बसवले.

चंद्रगुप्त मौर्य केवळ आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल शासक बनला. आचार्यांनी आयुष्यभर लोकांच्या भल्यासाठी काम केले आणि लोकांना धर्माचा मार्ग दाखवला. आचार्यांच्या धोरणांचे पालन करुन तुम्ही आजही तुमचे जीवन सोपे आणि करु शकता. येथे जाणून घ्या त्या 5 लक्षणांबद्दल जे तुम्हाला सूचित करतात कुटुंबावर येणारे आर्थिक संकट. आचार्यांनी चाणक्य नीतिमध्ये या लक्षणांचा उल्लेख केला आहे.

1. तुळशीचे रोप वाळणे

सनातन धर्मात तुळशीचे रोप पूजनीय आहे असे म्हटले आहे आणि प्रत्येक घरात ते लावावे असे सांगितले आहे. आचार्य म्हणतात की, जर घरात तुळशीचे रोप असेल तर त्याची विशेष काळजी घ्या. ते सुकू नये. तुळशीच्या झाड वाळणे हे आर्थिक संकटाचे लक्षण असू शकते.

2. वारंवार काच फुटणे

काच फुटणे अशुभ मानले जाते. आचार्य चाणक्य यांचा असाही विश्वास होता की घरात वारंवार काच फुटणे चांगले लक्षण नाही. यामुळे, घरातील आर्थिक स्थिती बिघडते आणि गरिबी येते.

3. वडीलधाऱ्यांचा अपमान करणे

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरात वडीलधाऱ्यांचा आदर केला जात नाही त्या घरात कधीही सुख आणि समृद्धी नांदू शकत नाही. मोठे लोक आपल्यासाठी केवळ आदरणीय नाहीत तर आवश्यक देखील आहेत. अशा परिस्थितीत, त्यांचा तिरस्कार केल्याने त्यांना वाईट वाटते आणि तुमच्या आयुष्यात समस्या येत राहतात. म्हणून, जर तुम्हाला घरात समृद्धी हवी असेल तर वडीलधाऱ्यांचा आदर करा.

4. वाद होणे

जर तुमच्या कुटुंबात वारंवार भांडणे होत असतील तर ते चांगले लक्षण नाही. जिथे वाद होतात तिथे लक्ष्मी कधीही वास करत नाही. अशा परिस्थितीत घरातील लोकांना कठोर परिश्रम करुनही अपयशाची चव चाखावी लागते आणि सर्व आर्थिक संकट सहन करावे लागते. त्यामुळे घरात नेहमी प्रेमळ वातावरण ठेवा.

5. पूजा न करणे

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की पूजा केल्याने घरात शुद्धीकरण होते. अशा घरात देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि सकारात्मकता येते. पण ज्या घरात पूजा होत नाही, त्या घरात नकारात्मकता राहते. कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होतात आणि आर्थिक संकट अधिक वाढत जातात. त्यामुळे तुमच्या घराचे वातावरण भक्तिमय ठेवा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या व्यक्तींच्या कर्माचे फळ तुम्हालाही भोगावे लागू शकते, नेहमी योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न करा

Chanakya Niti | नाती दृढ करण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या, चाणक्य निती काय सांगते…

सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.