AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच

मराठी भाषेत एक म्हण आहे पळसाला पाने तीनच किंवा घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ असा की जी आपल्या घरी परिस्थिती असते तीच प्रत्येकाच्या घरात सुद्धा असते. जवळपास सर्वांच्याच घरात काही न काही कारणामुळे वाद होत असतात. अनेकदा पती-पत्नीचं पटत नाही. असे प्रसंग घडू नये यासाठी चाणक्य यांनी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 9:21 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श कुटुंब कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचसोबत घरातील कुटुंबप्रमुखाची कर्तव्य काय आहेत? पत्नीची कर्तव्य काय आहेत? मुलांची कर्तव्य काय आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्ट चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्या आहेत. चाणक्य म्हणतात कुटुंबातील प्रत्येक घटक आपल्या मर्यादा ओळखून आणि कर्तव्य लक्षात घेऊन समोरच्या व्यक्तीसोबत व्यवहार करतो, तेव्हा घरात कधीही वादविवादाचे प्रसंग उद्भवत नाहीत आणि घर शातं राहतं. पुढे चाणक्य असेही म्हणतात ज्या घरात सतत भांडणं होतात, घर अशांत असतं अशा घरात कधीही पैसा टिकत नाही. घरा शांत रहावं वादविवाद होऊ नये यासाठी चाणक्य यांनी काही उपाय सांगितले आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती जाऊन घेऊयात.

जीभेवर नियंत्रण – चाणक्य म्हणतात तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला मारहाण केली तर ती जखम काळाच्या ओघात भरू निघते, मात्र तुम्ही जेव्हा बोलून एखाद्या व्यक्तीला दु:खी करता, तेव्हा ती जखम आयुष्यात कधीही भरू निघत नाही. जीभेनं केलेली जखम कधीही भरून निघत नाही. त्यामुळे आपला आपल्या जीभेवर ताबा हवा. माणसानं नेहमी जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा असा सल्ला चाणक्य देतात.

आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तींचा आदर करा – चाणक्य म्हणतात जे व्यक्ती आपल्यापेक्षा वयानं मोठे आहेत, अशा लोकांचा आदर करा. कारण त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा खूप मोठा असतो. ज्या घरात वृद्ध व्यक्तीचा सन्मान केला जातो, अशा घरात कधीही वादविवादाचे प्रसंग निर्माण होत नाहीत.

समाधान – चाणक्य म्हणतात तुम्हाला जे मिळालं आहे, त्यात समाधान ठेवा. मन शांत ठेवा, त्यामुळे घरात कधीही भांडणं होणार नाहीत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ.
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा.
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान..
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून....
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं.
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच.
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण.
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या.