AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्य बरबाद होईल, सुख-शांती निघून जाईल, या 4 लोकांना कधीच बनवू नका शत्रू

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी असे काही लोक सांगितले आहेत, ज्यांच्यासोबत चुकूनही शत्रूत्व घेऊन नका असा सल्ला चाणक्य देतात.

Chanakya Niti : आयुष्य बरबाद होईल, सुख-शांती निघून जाईल, या 4 लोकांना कधीच बनवू नका शत्रू
Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 23, 2025 | 9:57 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी असे अनेक विचार मांडले आहेत, जे आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य हे जसे अर्थतज्ज्ञ होते, तसे ते कुटनीती तज्ज्ञ देखील होते. त्यामुळे कोणासोबत कसा व्यवहार करावा? मित्रासोबत तुमचे संबंध कसे असावेत? राजाचा आपल्या प्रजेसोबत व्यवहार कसा असावा? तुमचा मित्र कोण आहे, शत्रू कोण आहे? हे कसं ओळखावं असे एकना अनेक विचार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितले आहेत.

दरम्यान चाणक्य आपल्या ग्रंथामध्ये असा सल्ला देतात की जगात असे चार लोक असतात, ज्यांच्यासोबत तुम्ही कधीही शत्रूत्व घेऊ नका. अन्यथा तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते. तुमच्या आयुष्यातून सूख -शांती नष्ट होऊ शकते, ते चार लोक कोण आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं जाणून घेऊयात.

शेजाऱ्याना शत्रू बनवू नका – चाणक्य म्हणतात तुमचे जे शेजारी आहेत, त्यांच्यासोबत कायम मैत्रीचं नातं ठेवा, त्यांच्यासोबत कधीही शत्रूत्व घेऊ नका. कारण त्यांची तुम्हाला कधीही मदत लागू शकते. तसेच तुम्ही जर त्यांना शत्रू बनवलं तर तुमच्या दूरच्या शत्रू पेक्षा अधिक कट कारस्थान तुमच्याविरोधात तुमचा शेजारी करू शकतो. कारण त्याला पूर्वीपासूनच तुमच्या सर्व गोष्टी माहिती असतात.

नातेवाईकांना, भावाला शत्रू बनवू नका –  चाणक्य म्हणतात चुकूनही तुमच्या नातेवाईकांना किंवा भावाला तुमचा शत्रू बनवू नका, लक्षात ठेवा तुमच्यावर जेव्हा वाईट प्रसंग येईल तेव्हा सर्वात आधी तेच तुमच्या मदतीला धावणार आहेत.

तुमच्या परिसरातील प्रतिष्ठित माणसाला शत्रू बनवू नका – चाणक्य म्हणतात तुमच्या परिसरामध्ये काही प्रतिष्ठित माणसं असतात, ज्यांचा समाजामध्ये मोठा मान असतो. अशा लोकांशी चांगलं वागा.

सत्ताधारी लोकांशी पंगा घेऊ नका – चाणक्य म्हणतात ज्यांच्या हातात सत्ता आहे, अशा लोकांना तुम्ही तुमचे शत्रू बनवले तर तुम्ही अडचणीत याल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.