AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे तीन लोक आयुष्यभर गरीबच राहतात; आर्य चाणक्यांनी काय सांगितलंय?

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : हे तीन लोक आयुष्यभर गरीबच राहतात; आर्य चाणक्यांनी काय सांगितलंय?
| Updated on: May 01, 2025 | 1:12 AM
Share

आर्य चाणक्य हे महान विद्वान, राजनितीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, कुटनीतीतज्ज्ञ आणि विचारवंत होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रथांमध्ये व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी चाणक्य यांनी सांगितल्या आहेत. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये व्यक्तीनं आयुष्य कसं जगावं? आयुष्यात काय करावं? काय करू नये? आदर्श पत्नी कशी असावी? आदर्श पत्नीची लक्षण काय आहेत. आदर्श पती कोणाला म्हणावं? आपला खरा मित्र कसा ओळखावा, आपला शत्रू कोण? अशा मनुष्य हिताच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहे.

आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रथांमध्ये सांगितलं आहे की, जर व्यक्ती सतत काम करत असेल तर तो लवकरच श्रीमंत होतो. मात्र जे लोक आळशी असतात. ज्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणा नसतो, तसेज ज्यांना वेळीची किंमत नसते असे लोक आयुष्यभर गरीब राहतात, त्यामुळे मनुष्यानं या गोष्टींचा त्याग केला पाहिजे असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य काय सांगतात? 

आर्य चाणक्य म्हणतात जे लोक आळशी असतात, कुठलाही काम धंदा करत नाहीत, ज्यांची नजर सतत आयत्या मिळणाऱ्या गोष्टींवर असते. असे लोक आपल्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत, असे लोक कायम गरीब राहतात.

तसेच ज्या लोकांना वेळीची किंमत नसते, असे लोक देखील कधीच प्रगती करत नाहीत. कारण असे लोक नेहीमी वेळ निघून गेल्यानंतर निर्णय घेतात किंवा काम करतात. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, आणि वेळ निघून गेल्यानंतर केलेलं काम हे व्यर्थ असतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

प्रामाणिकपणा – आर्य चाणक्य म्हणतात जर व्यक्ती आपल्या कामामध्ये प्रामाणिक नसेल तर त्यांचं काम कधीही परीपूर्ण होणार नाही. असे लोक प्रत्येक काम अपूर्ण करतात. याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही कोणतंही काम करत असाल ते काम प्रामाणिकपणे करा असा सल्ला आर्य चाणक्य देतात.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक