AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीला जल अर्पण करताना या चुका करू नका, धर्मशास्त्रात अशी आहे मान्यता

हिंदू धर्मशास्त्रानुसार, तुळशीचं रोप दारात असणं शुभ मानलं जातं. पिढ्यानुपिढ्या तुळशीचं रोप अंगणात असलेलं पाहायला मिळतं. तुळशीच्या रोपात सदैव सकारात्मक उर्जेचा संचार असतो असं मानलं जातं. त्यामुळे तुळशीचं रोप अंगणात असावं. पण तुळशीची पूजा करताना धर्मशास्त्रात काही नियम सांगितले गेले आहेत.

तुळशीला जल अर्पण करताना या चुका करू नका, धर्मशास्त्रात अशी आहे मान्यता
| Updated on: Nov 16, 2024 | 2:52 PM
Share

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदातही तुळशी महिमा वर्णिला गेला आहे. तुळशीमुळे घरात सुख समृद्धीचा वास होतो अशी मान्यता आहे. तुळशीचे दोन प्रकार आहेत. रामा तुळस आणि कृष्ण तुळस.. दोन्ही नावं ही भगवान विष्णुंच्या रुपांची आहेत. त्यामुळे तूळस आणि भगवान विष्णुंचं नातं अधोरेखित करते. जिथे भगवान विष्णु तिथे माता लक्ष्मी.. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी तुळशीची पूजा करण्याची मान्यता आहे. सत्यनारायणाच्या पूजेतही तुळशीपत्र वाहिली जातात. यावरूनच कळतं की तुळस ही भगवान विष्णुंना किती प्रिय आहे. भगवान विष्णुंना कोणताही नैवेद्य हा तुळशी पत्राशिवाय अर्धवट मानला जातो. यावरून तुळशीचं महत्त्व अधोरेखित होतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ पूजा करताना तुळशी वृंदावनापाशी दिवा लावला जातो. दिवा लाविला तुळशीपाशी..आणि उजेड पडला विष्णुपाशी..अशी प्रार्थनाही म्हंटली जाते. पण या तुळशीची पुजा करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा अपेक्षित फळ मिळत नाहीत. याबाबत धर्मशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. त्याचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे.

तुळशीला कायम सूर्योदय म्हणजेच सकाळी जल अर्पण करावं. यावेळेस जल अर्पण केल्यास इच्छित फळप्राप्ती होते. तसेच आर्थिक प्रश्नही दूर होतात. पण तुळशीला जल अर्पण करताना दोन दिवस कायम लक्षात ठेवायचे. एक रविवार आणि दुसरा एकादशी. या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये. कारण एकादशीला तुळशीचा निर्जला उपवास असतो. जल अर्पण केल्यास व्रत भंग होतो अशी मान्यता आहे. दुसरीकडे, तुळशीला अधिक प्रमाणात जल अर्पण करू नये. यामुळे तुळशीचं मूळ खराब होतात आणि रोप सुकतं. तुळशीचं रोप सुकणं चांगलं मानलं जात नाही.

तुळशीचं रोप लावताना कायम कोणत्या दिशेस असावं याचं भान ठेवणं गरजेचं आहे. दक्षिण दिशेस चुकूनही रोप लावू नये. नाही तर नकारात्मक उर्जेचा संचार होतो. दुसरं, महिलांनी तुळशीची पूजा करताना कायम केस बांधून पूजा करावी असं धर्मशास्त्र सांगतं. यामुळे तुळशीमातेची कृपा राहते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.