AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीला जल अर्पण करताना या चुका करू नका, धर्मशास्त्रात अशी आहे मान्यता

हिंदू धर्मशास्त्रानुसार, तुळशीचं रोप दारात असणं शुभ मानलं जातं. पिढ्यानुपिढ्या तुळशीचं रोप अंगणात असलेलं पाहायला मिळतं. तुळशीच्या रोपात सदैव सकारात्मक उर्जेचा संचार असतो असं मानलं जातं. त्यामुळे तुळशीचं रोप अंगणात असावं. पण तुळशीची पूजा करताना धर्मशास्त्रात काही नियम सांगितले गेले आहेत.

तुळशीला जल अर्पण करताना या चुका करू नका, धर्मशास्त्रात अशी आहे मान्यता
| Updated on: Nov 16, 2024 | 2:52 PM
Share

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदातही तुळशी महिमा वर्णिला गेला आहे. तुळशीमुळे घरात सुख समृद्धीचा वास होतो अशी मान्यता आहे. तुळशीचे दोन प्रकार आहेत. रामा तुळस आणि कृष्ण तुळस.. दोन्ही नावं ही भगवान विष्णुंच्या रुपांची आहेत. त्यामुळे तूळस आणि भगवान विष्णुंचं नातं अधोरेखित करते. जिथे भगवान विष्णु तिथे माता लक्ष्मी.. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी तुळशीची पूजा करण्याची मान्यता आहे. सत्यनारायणाच्या पूजेतही तुळशीपत्र वाहिली जातात. यावरूनच कळतं की तुळस ही भगवान विष्णुंना किती प्रिय आहे. भगवान विष्णुंना कोणताही नैवेद्य हा तुळशी पत्राशिवाय अर्धवट मानला जातो. यावरून तुळशीचं महत्त्व अधोरेखित होतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ पूजा करताना तुळशी वृंदावनापाशी दिवा लावला जातो. दिवा लाविला तुळशीपाशी..आणि उजेड पडला विष्णुपाशी..अशी प्रार्थनाही म्हंटली जाते. पण या तुळशीची पुजा करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा अपेक्षित फळ मिळत नाहीत. याबाबत धर्मशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. त्याचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे.

तुळशीला कायम सूर्योदय म्हणजेच सकाळी जल अर्पण करावं. यावेळेस जल अर्पण केल्यास इच्छित फळप्राप्ती होते. तसेच आर्थिक प्रश्नही दूर होतात. पण तुळशीला जल अर्पण करताना दोन दिवस कायम लक्षात ठेवायचे. एक रविवार आणि दुसरा एकादशी. या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये. कारण एकादशीला तुळशीचा निर्जला उपवास असतो. जल अर्पण केल्यास व्रत भंग होतो अशी मान्यता आहे. दुसरीकडे, तुळशीला अधिक प्रमाणात जल अर्पण करू नये. यामुळे तुळशीचं मूळ खराब होतात आणि रोप सुकतं. तुळशीचं रोप सुकणं चांगलं मानलं जात नाही.

तुळशीचं रोप लावताना कायम कोणत्या दिशेस असावं याचं भान ठेवणं गरजेचं आहे. दक्षिण दिशेस चुकूनही रोप लावू नये. नाही तर नकारात्मक उर्जेचा संचार होतो. दुसरं, महिलांनी तुळशीची पूजा करताना कायम केस बांधून पूजा करावी असं धर्मशास्त्र सांगतं. यामुळे तुळशीमातेची कृपा राहते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.