AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalashtami 2025: कालाष्टमीच्या दिवशी भैरव बाबांना ‘या’ गोष्टी अर्पण केल्यास तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण…

Kalashtami Pooja Vidhi: कालाष्टमीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिले जाते. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवची पूजा केली जाते. या दिवशी स्वच्छ आणि सकारात्मक विचारांनी पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छ पूर्ण होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया कालाष्टमीच्या दिवशी पूजा करण्याची योग्य पद्धत काय?

Kalashtami 2025: कालाष्टमीच्या दिवशी भैरव बाबांना 'या' गोष्टी अर्पण केल्यास तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण...
| Edited By: | Updated on: Feb 15, 2025 | 3:50 PM
Share

हिंदू धर्मात कालाष्टमीला खूप महत्त्व दिले जाते. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमीचे व्रत केले जाते. कालाष्टमीच्या दिवशी बाबा काल भैरव यांची पूजा केली जाते आणि त्यांच्या नावाने उपवास केला जातो. मान्यतेनुसार, कालभैरव हे महादेवाचे उर्ग रूप आहे. विहित विधींनुसार आणि सकारात्मक मनानी पूजा केल्यामुळे त्या व्यक्तीला भीतीपासून मुक्तता मिळते आणि त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, कालाष्टमीच्या दिवशी बाबा कालभैरव यांची विधिवत पूजा केली आणि त्यांचे आवडते अन्न त्यांना अर्पण केले तर त्याच्या आयुष्यातील अडखळे कमी होतात, त्याच्या जीवनामध्ये सर्व सकारात्मक गोष्टी घडतात आणि व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्त करतात.

कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.47 वाजता सुरू होईल आणि 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.57 वाजता समाप्त होणार आहे. अशा परिस्थितीत, 20 फेब्रुवारी रोजी कालाष्टमी व्रत केले जाईल. कालाष्टमीच्या दिवशी महादेवाची म्हणजेच कालभैरव बाबाची पूजा केली जाते. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवचे व्रत केल्यामुळे तुमच्या कामामध्ये प्रगती होण्यास सुरूवात होते. त्यासोबतच तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते.

कलष्टमीच्या दिवशी बाबा कालभैरवाला गुलगुला, जलेबी किंवा हलवा या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. मान्यतेनुसार, हे सर्व पदार्थ भैरव बाबांना अत्यंक प्रिय मानले जाते. कालष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवाला मद्य अर्पण करण्याचेही महत्त्व आहे, म्हणून तुम्ही या दिवशी त्यांना मद्य अर्पण करू शकता. कालाष्टमीच्या दिवशी पूजेदरम्यान कालभैरवाला सुपारी, सुपारी, लवंग आणि तोंडाला फ्रेशनर इत्यादी अर्पण करणे शुभ मानले जाते. एक गोष्ट लक्षात ठेवावी की जेव्हा जेव्हा तुम्ही कालाष्टमीची पूजा करता आणि अन्न अर्पण करता. त्यानंतर, गरिबांना नक्कीच जेवण द्या. याचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल. कालाष्टमीच्या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी करण्यास मदत होते.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, कालाष्टमी व्रत भगवान कालभैरवाला समर्पित आहे. कालाष्टमीच्या दिवशी जो व्यक्ती उपवास करतो आणि विधीनुसार कालभैरवची पूजा करतो त्याला भीती आणि दुःखांपासून मुक्तता मिळते आणि त्यासोबतच सर्व रोगांचा नाश होतो आणि त्यांचे आरोग्य निरोगी राहाते. मंदिरात कालभैरवाची पूजा करण्याचा नियम आहे, जे लोकं मंदिरामध्ये जाऊन भगवान कालभैरवाची पूजा करतात त्यांना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळतो आणि त्यांची त्यांच्या कामामध्ये प्रगती होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.