AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha 2021 | श्राद्ध करु शकत नसाल, तर ही 5 कामं करा, पूर्वज प्रसन्न होतील

या दिवसात श्राद्ध पक्ष (Shradh Paksha 2021) सुरु आहे. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालणाऱ्या श्राद्ध पक्षाला पितृपक्ष असेही म्हणतात. असे मानले जाते की, पितृपक्षाच्या वेळी मृत्यू झालेले आपले पूर्वज पृथ्वीवरील त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी पितृलोकातून येतात. या दरम्यान, वंशज पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध पूर्वजांना अन्न आणि पाण्याच्या स्वरुपात करतात.

Pitru Paksha 2021 | श्राद्ध करु शकत नसाल, तर ही 5 कामं करा, पूर्वज प्रसन्न होतील
Pitru-Paksha
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 1:02 PM
Share

मुंबई : या दिवसात श्राद्ध पक्ष (Shradh Paksha 2021) सुरु आहे. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालणाऱ्या श्राद्ध पक्षाला पितृपक्ष असेही म्हणतात. असे मानले जाते की, पितृपक्षाच्या वेळी मृत्यू झालेले आपले पूर्वज पृथ्वीवरील त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी पितृलोकातून येतात. या दरम्यान, वंशज पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध पूर्वजांना अन्न आणि पाण्याच्या स्वरुपात करतात.

सहसा श्राद्ध मोठा किंवा धाकटा मुलगा करतो. मधले मुलं आणि मुली वगैरे श्राद्ध करत नाहीत. पण, विशेष परिस्थितीत मधला मुलगा, मुलगी आणि पत्नी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण देखील करु शकतात. जर तुमच्यासोबतही असे काही घडले असेल किंवा तुम्ही काही कारणांमुळे तुमच्या पूर्वजांसाठी श्राद्ध करण्यास असमर्थ असाल तर पितृपक्षाच्या वेळी या 5 गोष्टी करा. तुमच्या या कृतीतून पूर्वजांना समाधान मिळेल आणि तुमच्यावर प्रसन्न झाल्यानंतर ते पितृ लोकात परततील.

पितृपक्षात या 5 गोष्टींमुळे पूर्वज प्रसन्न होतात –

1. जे लोक पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध करु शकत नाहीत, त्यांनी सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीला घरी बोलावून त्यांना आदराने खायला द्यावे आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना कपडे आणि दक्षिणा देऊन निरोप घ्यावा.

2. पितृपक्षाच्या वेळी पैसे आणि अन्नधान्य दान करावे. याशिवाय गाय, कुत्रा आणि इतर प्राणी आणि पक्षांची सेवा करा. असे मानले जाते की या काळात तुमचे पूर्वज कोणत्याही स्वरुपात तुम्हाला भेटायला येऊ शकतात. शक्य असल्यास, गोठ्यात किंवा मंदिरात पैसे, हिरवे गवत आणि पूजा साहित्य दान करा. पूर्वजांच्या नावाने प्याऊ उघडा. यामुळे पूर्वजांना आनंद होतो.

3. जर तुम्हाला श्राद्ध करता येत नसेल तर नदीत काळे तीळ अर्पण करुन प्रार्थना करा. यानंतर, पूर्वजांचे ध्यान करा आणि गरजूंना काळे तीळ दान करा.

4. सकाळी लवकर उठून हनुमानजींची पूजा करा. सूर्य देवाला जल अर्पण करा आणि पूर्वजांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. पिंपळावर नियमितपणे पाणी अर्पण करा. असे मानले जाते की पिंपळावर अर्पण केलेले पाणी थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते.

5. पितृ पक्षाच्या दिवसांमध्ये आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी, गीता, रामायण किंवा गरुड पुराणांचे पठण करा. जर तुम्ही स्वतः वाचू शकत असाल तर तुम्ही स्वतःच पठण करा. जर तुम्ही संपूर्ण पुराण एकत्र वाचू शकत नसाल तर दररोज थोडे वाचून ते पूर्ण करा. असे मानले जाते की यामुळे पूर्वजांना सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि ते समाधानी असतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Pitru Paksha 2021 : श्राद्धात ब्राह्मणांना जेवण देताना या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पूर्वज नाराज होऊ शकतात

Shashthi Shraddha 2021 : जाणून घ्या तारीख, वेळ, महत्त्व, पूजा विधी आणि या विशेष दिवसाबद्दल

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.