AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : जर वारंवार तुम्हाला या गोष्टी दिसत असतील तर समजू जा लवकरच तुमचे दिवस बदलणार, तुम्ही श्रीमंत होणार

वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टींना शुभ माण्यात आलं आहे, जर अशा गोष्टी तुम्हाला वारंवार दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत, तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होणार आहेत. तुम्ही श्रीमंत होणार आहात, अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : जर वारंवार तुम्हाला या गोष्टी दिसत असतील तर समजू जा लवकरच तुमचे दिवस बदलणार, तुम्ही श्रीमंत होणार
vastu tipsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 9:42 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी या अत्यंत शुभ माण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला काही आनंदाची बातमी मिळणार असेल किंवा तुम्हाला अचानक मोठ्या धनाची प्राप्ती होणार असेल तर त्यापूर्वी काही संकेत मिळतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरात सुख समृद्धी असावी, घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हाव. आपल्याकडे पुरेसे पैसे असावेत. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्यावर असावा. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार असते, त्यापूर्वी आपल्याला काही संकेत मिळतात. जर तुम्हालाही हे संकेत मिळत असतील तर समजून जा लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत. तुम्ही श्रीमंत होणार आहात. चला तर मग अशाच काही संकेतांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

वारंवार मुंग्या दिसणं – जर वारंवार तुमच्या घरात मुंग्या निघत असतील, मुंग्यांची रांग लागलेली असेल तर समजू जा लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत. हा एक अत्यंत शुभ संकेत असतो. जर तुम्हाला तुमच्या घरात वारंवार मुंग्या दिसत असतील तर याचा अर्थ तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार असून, तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होणार आहोत. जर तुमच्या घरात मुंग्या निघत असतील तर त्यांना मारू नका, त्याऐवजी त्यांना थोडीशी कणिक आणि गूळ देणं हे अत्यंत शुभ मानलं जातं.

लाल साडी घातलेली महिला – जर तुम्हाला वारंवार लाल साडी घातलेली महिला दिसत असेल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते, याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे. तुमचे दिवस बदलणार आहेत.

माजंरीची पिल्लं – जर तुमच्या घरामध्ये मांजरीने पिल्लांना जन्म दिला, किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या परिसरामध्ये मांजरीचे पिल्ल दिसत असतील तर हा देखील एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा की लवकच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार असून, तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होणार आहोत. त्यामुळे कधीही अशा पिल्लांना घरातून बाहेर काढू नका, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

स्वप्न – जर तुम्हाला स्वप्नात गरुड पक्षी किंवा गंगा नदी दिसली तर समजून जा की तुमचे दिवस आता लवकरच बदलणार आहेत, तुमच्या आयुष्यात अकस्मात मोठ्या धनाचा योग आहे. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होणार आहे, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.