Vastu Shastra : या रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या चुका तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्यामुळे घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्याचा परिणाम हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे, जसं की तुमच्या घराची रचना कशी असावी इथपासून ते तुमच्या घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत, इथपर्यंत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू असतात, या वस्तू योग्य दिशेलाच ठेवल्या गेल्या पाहिजेत, याची दिशा जर चुकली तर मग घरात वास्तुदोष निर्माण होतो. जसं की तुळशीचं झाडं हे नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच ठेवलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं असे अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्याचा आयुष्यात आपल्याला मोठा फटका बसतो. आयुष्यात अनेक संकटं येतात, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
जेवणानंतर ताटात पाणी ओतणं – वास्तुशास्त्रानुसार अनेकांना अशी सवय असते की ते जेवणानंतर ताटामध्येच हात धुतात, मात्र ही सवय अत्यंत चुकीची आहे. तुम्ही ज्या ताटात जेवलात त्याच ताटामध्ये हात धुणं किंवा ताटामध्ये पाणी ओतणं हे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. हा अन्नाचा अपमान मानला गेला आहे. यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होते. अन्न, धान्यामध्ये बरकत राहत नाही. अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
जेवल्यानंतर खरकटी भांडी तशीच ठेवणं – वास्तुशास्त्रानुसार रात्री जेवल्यानंतर सर्व खरकटी भांडी स्वच्छ धुवून मगच झोपावे. जर सकाळपर्यंत खरकटी भांडी तशीच ठेवली आणि ही कृती जर दररोज होत असेल तर अशावेळी घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्यामुळे जेवल्यानंतर रात्री कधीही किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता – जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता असेल, नियमितपणे स्वच्छता होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये घरात वास्तुदोष निर्माण होतो. कारण तुमचा घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. घर जर स्वच्छ असेल तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
